AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे म्हणाले निरर्थक अधिवेशन, शंभुराज देसाईंनी एका वाक्यात विषय संपवला

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या टीकेला आता शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले निरर्थक अधिवेशन, शंभुराज देसाईंनी एका वाक्यात विषय संपवला
| Updated on: Mar 27, 2025 | 6:11 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता ठाकरे यांच्या या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले शंभुराज देसाई?

काल विधिमंडळाचं अधिवेशन पूर्ण झालं. जे काही कामकाज झालं ती माहिती दिली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. अधिवेशनातील कामकाजाला निरर्थक कामकाज झालं असं ते म्हणाले. याचं मला नवलं वाटलं.  आहो पण तुम्ही जर अधिवेशनात भाग घेतला तर तुम्हाला कामकाजाचा अर्थ समजेल. पाहुण्यासारखं यायचं आणि निघून जायचं असं जे करतात त्यांना अर्थ काय कळणार? त्यासाठी पूर्णवेळ सभा गृहात बसावं लागतं. लोकांचे प्रश्न मांडावे लागतात असा टोला यावेळी शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की तुम्ही रेकॉर्ड काढून बघा दोघे अधिवेशनात किती वेळा आले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं असतं.  यामध्ये ठाकरे पिता पुत्रांनी भाग घेतला नाही, ते फक्त माध्यमांकडे जाऊन टीका करत आहेत. त्यांनी अधिवेशनात भाग घेतला असता तर त्यांना अर्थ कळाला असता. त्यांनी नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. खरी शिवसेना माझीच आहे असं ते म्हणाले. उद्धवजींचा आम्ही आदर करतो, पण कायदेशीर मार्गाने आम्ही आमची भूमिका मांडली, पुरावे सादर केले आणि त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगानं सादर केला. न्यायालयानं देखील यात हस्तक्षेप केला नाही.

आम्ही 80 जागा लढलो त्यापैकी 60 जिंकलो , शिवसेना ठाकरे गटाचे फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आमदार निवडून आले. लोकांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, मात्र तरी आपलं तेच खरं अशी त्यांची भूमिका आहे. आज ते लोकांमध्ये जाऊ शकत नाहीत. पदाधिकारी त्यांना सोडून चालले आहेत, असा घणाघात यावेळी शंभूराज देसाई यांनी केला आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.