सोनम वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. तसेच त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.

सोनम वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले
| Updated on: Jul 18, 2026 | 12:11 PM

दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीवरून आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक हे गेल्या 20 दिवसांपासून आंदोलनाला बसले होते. परंतु आज दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना कोर्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईने जंतर-मंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ झालाय. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोनम वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

शरद पवार म्हणाले, पाच-सहा दिवसांत अटक करतील, नेमकं तसं झालं आहे. त्यांची मागणी काय होती, तर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा… का तर…त्यांच्याकडे शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी होती. परंतु त्यांनी ती जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही. त्यांच्या परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर झाला. आंदोलनातून मागणी होत आहे, तरी केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. शेवटी त्यांच्या मागणीसाठी इतर राजकीय पक्ष देखील उभे राहिले’.

‘काँग्रेसच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी गेले. राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे गेल्या. सर्व जण एक सामूहिक मागणी करत होते. हे आवाक्याच्या बाहेर गेल्याचं लक्षात आलं, त्यानंतर अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अटकसत्र झालं. बघुयात. सोनम वांगचुक यांना अटक जरी झाली, तरी आंदोलन सुरू राहणार. मागणी रास्त होती. विद्यार्थ्यांसाठी होती, असे शरद पवार यांनी सांगितले. 20 दिवसांत दिल्लीत असूनही तुम्ही भेटायला येत नाही. हे आंदोलन सुरूच राहील. या विषयानेच संसदेला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले.

नाना पटोले काय म्हणाले?

काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, ‘येत्या 20 तारखेला त्यांचा संसदेवर मार्च होणार होता. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना ताब्यात घेतलं असेल. ज्या पद्धतीने मोदी सरकार नवीन पिढीचं आयुष्य खराब करत आहे. त्यांनाही आताही नीटचे निकाल आले. त्याची मार्कशीटमध्येही घोळ आहे. तो नवा घोटाळा आहे. साध्या परीक्षा देखील सरकार पारदर्शक घेऊ शकत नाही. या नवीन पिढी बरबाद करत आहे. त्यामुळे ही पिढी उठली आहे. राहुल यांच्याही तरुणांसाठी सभा झाल्या. तरुणांच्या मनात राग आहे. तो राग वांगचुक यांच्या आंदोलनातून पुढे येत होते. नरेंद्र मोदी हे अमेरिकेला सरेंडर होतील. पण देशातील लोकांवर दडपशाही आणत आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us