AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मर्सिडीजचं ‘ते’ वक्तव्य नीलम गोऱ्हेंकडून मागे?

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असं वक्तव्य निलम गोऱ्हे यांनी केलं होतं, आता त्यांनी आपलं हे वक्तव्य मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मोठी बातमी! मर्सिडीजचं 'ते' वक्तव्य नीलम गोऱ्हेंकडून मागे?
| Updated on: Mar 02, 2025 | 5:37 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं होतं, आता त्यांनी आपलं हे वक्तव्य मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता, त्यांना पक्षाकडून नोटीस बजवण्यात आली होती, या नोटीसीनंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आपलं वक्तव्य मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून देखील पुढची कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, या संमेलनातील एका सत्रात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लगत होत्या, असा आरोप गोऱ्हे यांनी केला होता. यावरून राजकारण चांगलंच तापलं. शिवसेना ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला होता.  खासदार संजय राऊत यांनी तर थेट अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून या वक्तव्याप्रकरणात निलम गोऱ्हे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीनंतर आता नीलम गोऱ्हे यांनी आपलं वक्तव्य मागे घेतल्याची माहिती समोर येत आहे, त्यांनी या प्रकरणात दिलगिरी देखील व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून पुढची कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

संजय राऊत यांचं उषा तांबेंना पत्र

दरम्यान गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. ‘दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरीत माफी मागावी.’ असं राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.

Follow Us
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग