AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मर्सिडीजचं ‘ते’ वक्तव्य नीलम गोऱ्हेंकडून मागे?

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असं वक्तव्य निलम गोऱ्हे यांनी केलं होतं, आता त्यांनी आपलं हे वक्तव्य मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मोठी बातमी! मर्सिडीजचं 'ते' वक्तव्य नीलम गोऱ्हेंकडून मागे?
| Updated on: Mar 02, 2025 | 5:37 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं होतं, आता त्यांनी आपलं हे वक्तव्य मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता, त्यांना पक्षाकडून नोटीस बजवण्यात आली होती, या नोटीसीनंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आपलं वक्तव्य मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून देखील पुढची कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, या संमेलनातील एका सत्रात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लगत होत्या, असा आरोप गोऱ्हे यांनी केला होता. यावरून राजकारण चांगलंच तापलं. शिवसेना ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला होता.  खासदार संजय राऊत यांनी तर थेट अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून या वक्तव्याप्रकरणात निलम गोऱ्हे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीनंतर आता नीलम गोऱ्हे यांनी आपलं वक्तव्य मागे घेतल्याची माहिती समोर येत आहे, त्यांनी या प्रकरणात दिलगिरी देखील व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून पुढची कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

संजय राऊत यांचं उषा तांबेंना पत्र

दरम्यान गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. ‘दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरीत माफी मागावी.’ असं राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.