AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला धक्का, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद जाणार

विधान परिषदेतील समीकरणे पुन्हा बदलणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एक आमदार कमी झाल्यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. ज्याची संख्या जास्त त्यांनी पद, ही सूत्र असल्याचे म्हटले आहे.

ठाकरे गटाला धक्का, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद जाणार
| Updated on: Jun 19, 2023 | 4:06 PM
Share

चंदन पुजाधिकारी, नाशिक : महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असते. आता शिवसेना ठाकरे गटाला अडचणीत आणण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेळली जाणार आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषदेती विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. ठाकरे गटातून मनीषा कायंदे शिंदे गटात आल्या आहे. त्याचा परिणाम मविआमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही मागणी केली.

काय म्हणाले अमोल मिटकरी

मनिषा कायंदे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची सदस्य संख्या एकने कमी झाली. आता ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करणार असल्याचे वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही केले आहे. 100 टक्के विधान परिषद विरोधी पंख नेते पदावर आम्ही दावा करू, असे ते म्हणाले.

कोणाकडे जाणार पद

विधान परिषदेत संख्या आमची जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद एकनाथ खडसे यांना द्यावं अशी आमची मागणी असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. 2018 साली शिवसेनेकडून मनिषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या आता ठाकरे गटातून शिंदे गटाकडे गेल्या आहे.

निवडीपासून होती नाराजी

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरुन महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून राजकारण पेटले होते. अंबादास दानवे यांनी निवडीचे पत्र दिल्यामुळे काँग्रेस अन् राष्ट्रवादी नाराज होते. यामध्ये त्यावेळी काँग्रेसनेही तर टोकाचीच भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी शिवसेनेने इतर पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे होते, म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण 78 सदस्या आहेत. त्यापैकी भाजपचे 24, शिवसेना 12 (दोन्ही गट) तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 10 सदस्या आहेत. तर इतर पक्षांचे सात सदस्य आहेत. विधान परिषदेत 15 जागा रिक्त आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेने केलेला दावा मान्य करण्यात आला.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.