काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघडकीस आला असून, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने काँग्रेसचे नेते भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस
bhai jagtap
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Jan 17, 2026 | 8:38 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) मुंबईतील काँग्रेस नेते व विधानपरिषदेचे सदस्य भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची सार्वजनिक मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू. बी. वेंकटेश यांनी 17  जानेवारी 2026 रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये, भाई जगताप यांनी माध्यमांमध्ये केलेली वक्तव्ये पक्षशिस्तीचे उल्लंघन असल्याचे नमूद केले आहे.  पक्षातील संघटनात्मक बाबी, नेतृत्व व मतभेद सार्वजनिक मंचावर मांडणे चुकीचे असून ते अंतर्गत व्यासपीठावरच मांडणे अपेक्षित असल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

अशा वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते, गोंधळ निर्माण होतो आणि संघटनात्मक एकतेला धक्का बसतो, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही या पत्राद्वारे भाई जगताप यांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता भाई जगताप यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून,  भाई जगताप हे या नोटीसला काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Live

Municipal Election 2026

09:12 PM

आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले

07:54 PM

उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश  

07:36 PM

नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार

07:31 PM

भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघड 

शुक्रवारी राज्यातील महापालिका निवडणुकीचे निकाल लागले या निवडणुकीमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. लातूरमध्ये तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. तर मुंबईमध्ये देखील तब्बल 24 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. मात्र एकीकडे पक्षानं महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे मात्र आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघड झाला असून, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची सार्वजनिक मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, आता या पत्राला भाई जगताप काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.