AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी सत्ताधाऱ्यांना पुरून उरलोय”; ठाकरे गटाच्या नेत्यानं शिवसेनेला एकाच वाक्यात सुनावलं

कोकणाबरोबर ठाकरे घराण्याची वेगळी आपुलकी आहे, मात्र गेल्या दोन दिवसांपासून वैभव नाईक यांच्या जिल्हाप्रमुख पदावरून कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यानंतर आता वैभव नाईक यांनी आपल्याच तोंडून आता स्पष्ट शब्दात विरोधकांना सुनावलं आहे.

मी सत्ताधाऱ्यांना पुरून उरलोय; ठाकरे गटाच्या नेत्यानं शिवसेनेला एकाच वाक्यात सुनावलं
| Updated on: Mar 13, 2023 | 4:11 PM
Share

सिंधुदुर्ग : कोकणबरोबर शिवसेनेचे अगदी घट्ट नाते आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते अगदी आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत कोकणाने नेहमीच त्यांच्यासाठी सढळ हाताने मदत केली आहे. त्यातच नारायण राणे आणि कोकणचा वाद हा शिवसेनेसाठी नवीन नाही. कोकणातील ठाकरे गटाच्या राजकीय घडामोडीमुळे कोकण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारणही तसंच महत्वाचं घडलं आहे, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर सिंधुदुर्गातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

जिल्हाप्रमुख पद काढून घेतल्याने वैभव नाईक नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यातच आता वैभव नाईक नाराज असून ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

त्यावर बोलताना आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की, ‘मी शिवसेनेत नाराज नाही,माझ्याबाबतीत बातम्या या प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत. जिल्हाप्रमुख पद काढून घेतले गेले असले तरी माझा शिंदे गटात जाण्याचा कोणताच विचार नाही. सिंधुदुर्गातील राजकारणात ठाकरे गटाचे वेगळे स्थान आहे.

त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या जाणीव पूर्वक निर्माण केल्या जात आहे.तसेच मी कोकणातील राजकारणात सत्ताधाऱ्यांना मी पुरून उरलोय असल्याचे खडे बोलही त्यांनी कोकणातील ठाकरे गटाच्या विरोधकांना सुनावले आहेत.

आमदार वैभव नाईक यांचे जिल्हाप्रमुख पद जाणार या बातम्या विरोधकांकडून पेरल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नुकताच नारायण राणे यांचे केंद्रीय मंत्री जाणार असल्याचे आपण सांगितले होते. त्या विधानानंतर याबाबत मी शिंदे गटात जाणार असा अपप्रचार सुरू केल्याचेही वैभव नाईक यांनी सांगितले.

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की, जिल्हाप्रमुख पद जरी माझ्याकडून काढून घेतले असले तरी त्याबाबत मी अजिबाद नाराज वैगरे नाही.

जिल्हाप्रमुख पद काढून घेतले असले तरी मी माझ्या ठाकरे गटाबरोबर बांधिल असून ठाकरे गटाला जेव्हा-केव्हा गरज असेल तेव्हा मी काम करत राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.

यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची इच्छा आहे की मी त्यांच्यासोबत जावं. मात्र मी बाळासाहेब ठाकरे यांचा आणि उद्धव ठाकरे यांच्याशी मी एकनिष्ठ असल्याचे सांगत ऊद्धव ठाकरे जे सांगतील तेच मी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.