AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांना कर्नाटकबद्दल प्रेम आहे, त्यांनी तिकडं जावं, मनसेनं आपली भूमिका मांडली

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी  वादग्रस्त मुद्दा उपस्थित केला असल्याने आता महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

ज्यांना कर्नाटकबद्दल प्रेम आहे, त्यांनी तिकडं जावं, मनसेनं आपली भूमिका मांडली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 25, 2022 | 6:06 PM
Share

पंढरपूरः राज्यशासनाकडून करण्यात येणारा कॉरिडॉर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. त्यामुळे पंढरपुरातील लोकांच्या घरांचे आणि इतर प्रकारचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नुकसान होणाऱ्या नागरिकांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभा राहणार असल्याची भूमिका पंढरपुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी स्पष्ट केले.

यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील चाळीस गावं आणि सोलापूर आणि अक्कलकोटवर त्यांनी दावा केल्या नंतर दिलीप धोत्रे यांनी बसवराज बोमई यांची मागणी चुकीची असून त्यांना इथे पायही ठेऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर पंढरपुरातील काही नागरिक, व्यावसायिक आम्ही कर्नाटकात जाण्यासाठी इच्छूक असल्याचे मत व्यक्त केल्या नंतर त्यांनी ज्यांना कर्नाटकात जावं वाटतं, त्याच्याबद्दल प्रेम वाटत असेल तर त्यांनी तिकडं जावं असा टोलाही त्यानी लगावला आहे.

पंढरपुरातील ज्या लोकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही घेऊन येऊ असा नारा दिला आहे. त्यांना विरोध करत, ज्यांना कर्नाटकात जावं वाटतं आहे.

त्यांनी खुशाल कर्नाटकात जावे टोलाही दिलीप धोत्रे यांनी लगावला आहे. बसवराज बोमई यांनी केलेला दावा चुकीचा असून त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र वाद प्रचंड वाढला आहे. त्यातच जत तालुक्यातील चाळीस गावांसह सोलापूर, अक्कलकोट यांच्यावर मुख्यमंत्री बोमई यांनी दावा केल्यामुळे पंढरपूरसह परिसरातील नागरिकांनी या दाव्याला जोरदार विरोध केला आहे.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी  वादग्रस्त मुद्दा उपस्थित केला असल्याने आता महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून कोल्हापूरतही ठाकरे गटाने जोरदार आंदोलन करुन कर्नाटकच्या बसला काळे फासून त्याच्या जय महाराष्ट्र लिहिले होते.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक