खासदार महास्वामी यांनी सोलापूरच्या विकासासाठी घेतली पंतप्रधानांची भेट, नेमकी चर्चा काय..?

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सोलापूरजिल्ह्याच्या कोणत्या विकासासाठी आता काम केले जाणार याची चर्चा आता होऊ लागली आहे.

खासदार महास्वामी यांनी सोलापूरच्या विकासासाठी घेतली पंतप्रधानांची भेट, नेमकी चर्चा काय..?
| Updated on: Dec 21, 2022 | 12:21 AM

सोलापूरः सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि विविध विषयांवर चर्चा करत सोलापूरचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हैसूर फेटा आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याचा विकास हा गतीने कसा करता येईल त्या संदर्भात त्यांची चर्चा केली असल्याचेही खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

मागील दोन दिवसापूर्वीच माजी खासदार संभाजीराजे यांनी सोलापूर दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी सोलापूरच्या विकासा संदर्भात आणि सोलापूरच्या विमानसेवे बाबत जाहीर वक्तव्य केली होती.

येथील खासदार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोलापूर जिल्ह्याचा विमानसेवेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणई त्यांनी केली होती. त्यानंतर दोन तीन दिवसातच सिद्धेश्वर महास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सोलापूर जिल्ह्याविषयी चर्चा केली.

सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि येथील प्रगतीसाठी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले. या भेटीदरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या विविध विषयांवर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सोलापूरजिल्ह्याच्या कोणत्या विकासासाठी आता काम केले जाणार याची चर्चा आता होऊ लागली आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी विमानसेवेची गरज असल्याचे मत माजी खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली हेही काही दिवसातच समजेल असंही बोललं जात आहे.