AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस सरकारला अजूनही गुवाहाटी दौऱ्यावरुनच का घेरलं जातंय; ठाकरे गटाने आता नेमकं काय म्हटले…

आदित्य ठाकरे यांनी सूरत-गुवाहाटीवरून टीका केल्यामुळे शिंदे गटाला त्यांनी डिवचल्यासारखं झाले. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही शिल्लक सेना म्हणत त्यांना त्यांनी पुन्हा डिवचलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारला अजूनही गुवाहाटी दौऱ्यावरुनच का घेरलं जातंय; ठाकरे गटाने आता नेमकं काय म्हटले...
| Updated on: Dec 21, 2022 | 12:00 AM
Share

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन करुन 5 महिने झाले आहेत तरीही सुरत आणि गुवाहाटीवरुन टोलेबाजी काही थांबताना दिसत नाही. त्यामुळे विधानसभेतही आदित्य ठाकरे यांची टीकेची गाडी सुरतकडे गेली आणि त्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांनीही मातोश्रीकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे शिंदे-ठाकरे गटातील वाद आणखी चिघळणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत चर्चा महामार्गावरील सुरक्षा आणि रस्त्यांसंदर्भातबाबत सुरू होती. पण आदित्य ठाकरे यांनी आपल्या चर्चेची गाडी सुरत आणि गुवाहाटीच्या दिशेनं घेऊन गेले.

आदित्य ठाकरे यांनी सूरत-गुवाहाटीवरून टीका केल्यामुळे शिंदे गटाला त्यांनी डिवचल्यासारखं झाले. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही शिल्लक सेना म्हणत त्यांना त्यांनी पुन्हा डिवचलं आहे.

त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार हे बोलायला उभा राहिले होते, आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना विषय वाढवू नये असंही म्हटले होते.

यावेळी अजित पवार बोलायला उभा राहिल्यानं मंत्री गुलाबराव पाटील हेही उभे राहिले आणि आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देत मातोश्रीवरुन त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले होते. त्यावरुन ठाकरे गटाला संधी मिळेल तिथं शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विधानसभेतही आदित्य ठाकरे यांनीच तिच संधी साधली आणि शिंदे गटाला सुरत-गुवाहाटी दौऱ्यावरून जोरदार टीका केली.

शिंदे-फडणवीस सरकार येऊन काही महिने उलटून गेले तरीही सुरत-गुवाहाटीवरून होणारी टीका काही थांबायचे नाव घेईना. हिवाळी अधिवेशनातही गुवाहाटी दौऱ्यावरून जोरदार हल्लाबोल विरोधकांकडून केला जात असल्याने त्यांच्याकडूनही मातोश्रीवर निशाणा साधला जात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.