AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळी पावसात द्राक्षबाग जमीनदोस्त; सोलापुरात शेतकरी पावसामुळे हवालदिल; शाळेचेही पत्रे उडाले

चानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कासेगावात काल मध्यरात्री अचानकपणे वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेला सुरूवात झाली आहे. त्यानंतर काहीवेळ गारपिटही झाली, त्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले द्राक्षपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी पावसात द्राक्षबाग जमीनदोस्त; सोलापुरात शेतकरी पावसामुळे हवालदिल; शाळेचेही पत्रे उडाले
दक्षिण सोलापुरातील कासेगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसानImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 10:23 PM
Share

सोलापूर: सोलापुरात रविवारी झालेल्या वादळ आणि गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) शेतीपिकांसह राहते घर तसेच शाळेचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावामध्ये (South Solapur Kasegaon) प्रचंड मोठ्या प्रमाणात हे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कासेगावात काल मध्यरात्री अचानकपणे वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेला सुरूवात झाली आहे. त्यानंतर काहीवेळ गारपिटही झाली, त्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले द्राक्षपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीच्या माऱ्यामुळे विक्रीला आलेल्या द्राक्ष (Grapes) बागेतील द्राक्षांचे घड फुटल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या किचनशेडचे पत्रे, नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गावातील वीज डेपोदेखील उन्मळून पडल्याने काल मध्यरात्रीपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

नुकसान भरपाईचे आश्वासन

या पावसामुळे जिवीतहानी झालेली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्याप्रमाणात झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान या नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर दुपारच्या सत्रात गावतलाठी तसेच विभागीय अधिकारी आणि आमदारांनी गावाला भेट देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामेदेखील सुरू करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

नुकसानीची पाहणी तात्काळ पंचनामे:

कासेगावमधील बिरोबा वस्ती येथे काल संध्याकाळी सात वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले आहे. यामध्ये बिरोबा वस्तीमधील शाळेच्या स्वयंपाक खोलीचे पत्रे उडाले असून गावातील सुमारे तीस ते पस्तीस घरावरील पत्रे उडाले आहेत. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. यामध्ये खाद्यपदार्थ, गहू, ज्वारी यासारख्या अनेक अत्यावश्यक वस्तूंचेही नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून शासकीय पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून गावकामगार तलाठी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून पंचनामे करून घेत आहेत. त्याचबरोबर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीदेखील गावाला भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले असल्याचे सरपंच सुरेखा काळे यांनी सांगितले.

हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावला:

द्राक्ष बागायत शेतकरी शिवाजी चौगुले यांनी सांगितले की, मी मागील वर्षी द्राक्षबाग लावली होती, कष्ट करुन ती वाढवली होती. या बागेसाठी मी 7 ते 8 लाख रूपये खर्च केले होते. पुढील दोन दिवसात माझी द्राक्षे व्यापारी घेऊन जाणार होता. मात्र अचानक काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्या गारपिटीमुळे माझ्या द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने तात्काळ मला मदत मिळाली तर शेतीचे नुकसान भरुन निघणार आहे.

संबंधित बातम्या

काय सांगता? पेट्रोल-डिझेल खरंच स्वस्त होणार? उत्पादन शुल्क कपातीबाबत केंद्राचा विचार सुरु

Ola-Uber : ‘उबेर’चा प्रवास 12 टक्क्यांनी महागला, उबेर-‘ओला’च्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

Anil Parab : कामगारांकडून उकळलेला पैसा बाहेर निघणार का?, अनिल परब म्हणतात…

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.