AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळी पावसात द्राक्षबाग जमीनदोस्त; सोलापुरात शेतकरी पावसामुळे हवालदिल; शाळेचेही पत्रे उडाले

चानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कासेगावात काल मध्यरात्री अचानकपणे वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेला सुरूवात झाली आहे. त्यानंतर काहीवेळ गारपिटही झाली, त्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले द्राक्षपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी पावसात द्राक्षबाग जमीनदोस्त; सोलापुरात शेतकरी पावसामुळे हवालदिल; शाळेचेही पत्रे उडाले
दक्षिण सोलापुरातील कासेगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसानImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 10:23 PM
Share

सोलापूर: सोलापुरात रविवारी झालेल्या वादळ आणि गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) शेतीपिकांसह राहते घर तसेच शाळेचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावामध्ये (South Solapur Kasegaon) प्रचंड मोठ्या प्रमाणात हे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कासेगावात काल मध्यरात्री अचानकपणे वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेला सुरूवात झाली आहे. त्यानंतर काहीवेळ गारपिटही झाली, त्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले द्राक्षपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीच्या माऱ्यामुळे विक्रीला आलेल्या द्राक्ष (Grapes) बागेतील द्राक्षांचे घड फुटल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या किचनशेडचे पत्रे, नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गावातील वीज डेपोदेखील उन्मळून पडल्याने काल मध्यरात्रीपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

नुकसान भरपाईचे आश्वासन

या पावसामुळे जिवीतहानी झालेली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्याप्रमाणात झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान या नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर दुपारच्या सत्रात गावतलाठी तसेच विभागीय अधिकारी आणि आमदारांनी गावाला भेट देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामेदेखील सुरू करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

नुकसानीची पाहणी तात्काळ पंचनामे:

कासेगावमधील बिरोबा वस्ती येथे काल संध्याकाळी सात वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले आहे. यामध्ये बिरोबा वस्तीमधील शाळेच्या स्वयंपाक खोलीचे पत्रे उडाले असून गावातील सुमारे तीस ते पस्तीस घरावरील पत्रे उडाले आहेत. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. यामध्ये खाद्यपदार्थ, गहू, ज्वारी यासारख्या अनेक अत्यावश्यक वस्तूंचेही नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून शासकीय पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून गावकामगार तलाठी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून पंचनामे करून घेत आहेत. त्याचबरोबर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीदेखील गावाला भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले असल्याचे सरपंच सुरेखा काळे यांनी सांगितले.

हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावला:

द्राक्ष बागायत शेतकरी शिवाजी चौगुले यांनी सांगितले की, मी मागील वर्षी द्राक्षबाग लावली होती, कष्ट करुन ती वाढवली होती. या बागेसाठी मी 7 ते 8 लाख रूपये खर्च केले होते. पुढील दोन दिवसात माझी द्राक्षे व्यापारी घेऊन जाणार होता. मात्र अचानक काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्या गारपिटीमुळे माझ्या द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने तात्काळ मला मदत मिळाली तर शेतीचे नुकसान भरुन निघणार आहे.

संबंधित बातम्या

काय सांगता? पेट्रोल-डिझेल खरंच स्वस्त होणार? उत्पादन शुल्क कपातीबाबत केंद्राचा विचार सुरु

Ola-Uber : ‘उबेर’चा प्रवास 12 टक्क्यांनी महागला, उबेर-‘ओला’च्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

Anil Parab : कामगारांकडून उकळलेला पैसा बाहेर निघणार का?, अनिल परब म्हणतात…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.