AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“फेसबुकवर मुख्यमंत्री सांगायचे माझं कुटुंब, तुमची जबाबदारी”; भाजपच्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली

उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, मात्र ते फेसबुकवरचे मुख्यमंत्री होते अशी टीका आता भाजपकडून केली जात आहे.

फेसबुकवर मुख्यमंत्री सांगायचे माझं कुटुंब, तुमची जबाबदारी; भाजपच्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 12, 2023 | 5:38 PM
Share

करमाळा/सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यापूर्वी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकारला पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. शिवसेना पक्ष आणि चिन्हही एकनाथ शिंदे गटाकडे गेल्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेनेचे वाद आणखी वाढले आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्हीही असल्याने त्यावरून हा वाद आणखी टोकाला पोहचला आहे.

त्यावरून ठाकरे गटाकडून वारंवार शिवसेनेसह भाजपवरही जोरदार निशाणा साधला जातो आहे. मात्र आता भाजपचे मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. तर त्याचवेळी मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी काय काम केले, त्यावरूनही जोरदार टीका केली जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते फक्त फेसबुकवरच होते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची करमाळ्यात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

बाळासाहेब विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की, उद्धव ठाकरे हे फक्त अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते, मात्र ते फक्त फेसबुकवरचचे मुख्यमंत्री होते अशी खोचक टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडून फेसबुकवर काय सांगायचे माझे कुटुंब तुमची जबाबदारी आणि हे घरात बसायचे.

तर यांची जबाबदारी आपण घ्यायची आणि लोक वाऱ्यावर सोडायची अशी खरमरती टीकाही त्यांनी यावेळी केली. करमाळा येथील स्वर्गीय माजी मंत्री दिगंबरराव बागल कृषी महोत्सवावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत