गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धांदल उडाली

| Updated on: Mar 18, 2023 | 5:05 PM

अवकाळी पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजने लागू करावी यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कोण करणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धांदल उडाली
Follow us on

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील उभा पिकांवर शेतकऱ्यांना नांगर फिरवावा लागला होता. तर आता पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर, माळशिरस तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसाना झाले आहे.

सध्या द्राक्षांचा हंगाम सुरू आहे, तर दुसरीकडे निर्यातीवर कर लावल्यामुळे द्राक्षांच्या दरावर मोठी परिणाम झाला आहे. त्यामुळे विक्रीसाठी असलेल्या द्राक्षांमुळेही शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असतानाच आता आणि निसर्गाने अवकाळी पावसाचा दणका दिल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील रेडे, मांडकी, कन्हेर, इस्लामपूर, भांब,सरगरवाडी या गावात गारासह जोरदार पाऊस झाला आहे.

त्यामुळे शेतातील पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. जोरदार अवकाळी पाऊस झाल्यामुळे गहू, मका आणि ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड धांदल उडाली आहे. गहू, ज्वारी आणि द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार का असा सवाल आता शेतकरी करून लागले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील रेडे, मांडकी, कन्हेर, इस्लामपूर, भांब, सरगरवाडी भागाला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

या भागात झालेल्या पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजने लागू करावी यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कोण करणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.