अंबाजोगाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत असल्या तरी ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्राही जोरदार पणे सुरु होती. शिवसेनेच्या उपगटनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतूनही सरकारवर आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार पणे हल्लाबोल केला होता. सुषमा अंधारे सध्या अंबाजोगाई दौऱ्यावर आहेत.