AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे भिडल्या, ‘काश्मीर ते कन्याकुमारी बच्चा बच्चा जानता है ncp म्हणजे…’

अजितदादा गटाचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांनी राष्ट्रवादीमधील ८० टक्के पदाधिकारी हे अजित दादा यांच्यासोबत असल्याचा दावा केलाय. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षांचे नाव आम्हालाच मिळणारा असा दावा त्यांनी केलाय. यावरून सुप्रिया सुळे यांनी बोचरी टीका केलीय.

सुप्रिया सुळे भिडल्या, 'काश्मीर ते कन्याकुमारी बच्चा बच्चा जानता है ncp म्हणजे...'
SHARAD PAWAR, AJIT PAWAR, SUPRIYA SULE, PRAFULL PATEL Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Oct 01, 2023 | 7:53 PM
Share

नागपूर : 1 ऑक्टोबर 2023 | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर, वर्धा आणि अमरावती असा त्यांचा दौरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे प्रश्न समजून घेऊन लढण्याचा प्रयत्न करत असतो. त्या माध्यमातून लोकांशी 365 दिवस संवाद साधत असतो. बरेच दिवस या भागात येणं झालं नाही म्हणून विदर्भाचा दौरा करत आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आमची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे लोकांना भेटण्याची ती आम्ही पार पाडतो असे त्या म्हणाल्या.

कांद्याची एवढी मोठी मीटिंग झाली. त्यामध्ये किती मंत्री गेले? एवढा मोठा कांद्याचा विषय असताना शेतकरी संकटात असताना यांचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. कांद्याचा प्रश्न गंभीर आहे हे मी चार महिने आधी ट्विट करून पियुष गोयल यांना सांगितलं होतं. जगात कांदा कमी आहे तिकडे जाऊ द्या असे सांगितलं होतं. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत होते ते ही यांना चांगलं दिसलं नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

इंडिया टू च्या मार्चचे स्वागत

हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप जर कोणी करत असेल तर हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांसाठी यांना वेळ नाही पण पक्ष फोड, नेते फोड यांच्यात त्यांचा वेळ जातोय. देशामध्ये इतका अन्याय होतो आहे त्यावर कोणीतरी बोललं पाहिजे. त्यासाठी इंडिया टू चा मार्च होत आहे याचे मी स्वागत करते, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि देशासमोर महागाई बेरोजगारी ही मोठी आव्हाने आहेत एलपीजीचे भाव वाढले आहे. पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे हे सगळे प्रश्न असताना इतिहासकार ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे जे तज्ञ आहे त्यांनी वाघ नखे संदर्भात आपले विचार व्यक्त करायला पाहिजे असे त्या म्हणाल्या.

दिल्लीचा अदृश्य हात असावा

सुरज चव्हाण हे इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत का? त्यांच्याबद्दल माझ्या ऐकण्यातही नाही आणि वाचण्यातही काही आलं नाही. मात्र, मला थोडा संशय यायला लागला आहे. प्रफुल पटेल तारीख सांगतात त्यांना तारीख कुठून मिळत आहे. यामागे तो दिल्लीचा अदृश्य हात असावा. अदृश्य हात सगळं चालवत आहे. त्यामुळे देशात लोकशाही आहे की नाही हे कळत नाही अशी टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही. शरद पवार यांनी २५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष स्थापन केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सगळ्यांना माहित आहे. पार्टी शरद पवार यांनी बनवली आहे तर मग चिन्ह इकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. देशात ‘काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बच्चा बच्चा जानता है की ncp म्हणजे शरद पवार.’ असे प्रत्युत्तर त्यांनी अजितदादा गटाला दिले.

अमरावतीला कोण उमेदवार?

अमरावतीमध्ये लोकसभा निवडणूक कोण लढविणार याचा निर्णय महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या बैठकीत ठरेल. आमची रणनीती तयार आहे. पण, तुम्हाला कशी सांगणार? चर्चा झाल्यावर अमरावतीला कोण उमेदवार असणार हे सांगू. भाजपच्या विरोधात बोललं की त्याला आईस केला जातो. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, ई डी, सी बी आय आणि यात काही नवल नाही असेही त्यांनी सांगितले.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.