AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेबाबत सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य…योजनेबाबत म्हटले…

supriya sule on ladki bahin yojana: शिवराज सिंह चौहान हे सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी मध्य प्रदेशमध्ये चांगले काम केले आहे. त्यांच्याकडे डेटा होता म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना चांगली राबवली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य...योजनेबाबत म्हटले...
supriya sule on ladki bahin yojana
| Updated on: Jul 04, 2024 | 12:20 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्यामुळे खरेच योजना किती महत्वाची आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे. या योजनेमध्ये भ्रष्टाचार होऊ नये, ही अपेक्षा आहे. या योजनेचे स्वागत केले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

शिवराज सिंह चौहान हे सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी मध्य प्रदेशमध्ये चांगले काम केले आहे. त्यांच्याकडे डेटा होता म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना चांगली राबवली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

कृषी खात्यात 118 कोटीचा घोटाळा

सुप्रिया सुळे यांनी कांदा प्रश्नावर मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आम्ही पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यांना कांदा, साखर यासंदर्भात सांगितले. शेतकरी अडचणीत येत आहेत. शेतकऱ्यांसाठी पॉलिसी करताना जुमलेबाजी करु नका. कांदा निर्यात बंदी केली त्याचा परिणाम दिसून आला. आधीचे मोदी सरकार आणि आताचे एनडीए सरकार लोकांनी नाकारले आहे. 118 कोटीचा घोटाळा कृषी खात्यात झाला आहे, हे मी नाही बोलत आहे, हा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सुरक्षा संघाने केला आहे. सरकारने चुकीची कृषी धोरण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. मात्र उद्योजकांचे कर्जमाफी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, अजित पवारांवर जे भष्ट्राचाराचे आरोप झाले, त्याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. हे पहिल्या दिवसांपासून दिसत आहे.

संभाजी भिडे यांनी साड्या न घालणाऱ्या महिलांनी वटसावित्रीची पूजा करु नये, असे वक्तव्य केले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संभाजी भिडे यांच्यावर कठोर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अपमान केला जात आहे. संभाजी भिडे आणि त्यांच्या लोकांकडून हे केला जात आहे, हे दुर्दैव आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.