AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राज्य सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला”; अर्थसंकल्पावरून शेतकऱ्यांची विदारकता या नेत्यानं सांगितली

धान उत्पादन शेतकऱ्यांबाबतही शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असला तरी अतिरिक्त मालाच्या साठवणूक आणि प्रक्रियाबाबत मात्र कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही असंही त्यानी यावेळी सांगितले.

राज्य सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला; अर्थसंकल्पावरून शेतकऱ्यांची विदारकता या नेत्यानं सांगितली
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 09, 2023 | 6:45 PM
Share

कोल्हापूर : राज्याचे अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केल्यानंतर त्यावर आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या अर्थसंकल्पावर सत्ताधाऱ्यांकडून सकारात्मक चर्चा करण्यात येत असली तरी विरोधी गटाकडून मात्र अर्थसंकल्पावर जोरदार टीका होऊ लागली आहे तर दुसरीकडे स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मात्र या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करताना ते म्हणाले की, राज्य सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला आहे.

ज्या प्रमाण हा चाट मसाला तेवढ्यापुरते चविष्ट वाटतं पण हाताला काही लागत नाही त्याच प्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पाचेही असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अर्थसंकल्प म्हणजे चाट मसला असल्याचा खोचक टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर सकारात्मकतेने बोलताना सांगितले की, शिंदे-फडणवीस सरकारने 6 हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर केले आहे पण केवळ रासायनिक खतांचा विचार केला तर त्यामध्ये किती तरी पटीने झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतून राहिलेल्या शेतकऱ्यांची अवस्था घर का ना घाट का अशी झाली होती त्यांच्याबाबत घेतलेला निर्णयही स्वागतार्ह असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

तर धान उत्पादन शेतकऱ्यांबाबतही शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असला तरी अतिरिक्त मालाच्या साठवणूक आणि प्रक्रियाबाबत मात्र कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही असंही त्यानी यावेळी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यानी राज्याचा अर्थसंकल्प मांडला असला तरी त्यामधून बऱ्याच गोष्टी राहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांबाबत जसा खोलवर विचार केला पाहिजे होता त्याप्रमाणे अर्थसंकल्पामध्ये विचार करण्यात आला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात खोली कमी आणि उथळपणा जास्त असल्याचे सांगितले.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय