सूर्य आग ओकतोय! राज्यातील 17 जिल्हाचं तापमान 40 अंशापेक्षा जास्त! तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

कोरोना संकटात तापमान वाढीचाही सामना राज्यातील जनतेला करावा लागत आहे. अशावेळी नागरिकांनी कोरोनासह उन्हापासूनही बचाव करणं गरजेचं बनलंय.

सूर्य आग ओकतोय! राज्यातील 17 जिल्हाचं तापमान 40 अंशापेक्षा जास्त! तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 8:52 PM

मुंबई : कोरोनाची स्थिती विदारक बनलेली असतानाच राज्यात सूर्य आग ओकत असल्याचं चित्र निर्माण झालंय. कारण आज राज्यात एकूण 17 जिल्ह्यातील पारा 40 अंशांपेक्षा जास्त नोंदवला गेलाय. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, नाशिक आणि मुंबईतही तीव्र उन्हाळा भासत आहे. त्यामुळे कोरोना संकटात तापमान वाढीचाही सामना राज्यातील जनतेला करावा लागत आहे. अशावेळी नागरिकांनी कोरोनासह उन्हापासूनही बचाव करणं गरजेचं बनलंय. (Temperatures above 40 degrees Celsius in many districts of Vidarbha and Marathwada)

कोणत्या शहरात किती तापमान ? (अंश सेल्सियसमध्ये)

अकोला – 42.9 अमरावती – 41.0 बुलडाणा – 40.0 ब्रम्हपुरी – 42.4 चंद्रपूर – 43.2 गडचिरोली – 40.6 गोंदिया – 40.5 नागपूर – 42.0 वर्धा – 42.4 वाशिम – 41.0 यवतमाळ – 41.7 मालेगाव – 41.8 सातारा – 39.0 परभणी – 40.8 बारामती – 38.8 नांदेड – 41.5 सोलापूर – 40.9 कोल्हापूर – 37.8 औरंगाबाद – 39.7 सांगली – 38.3 बीड – 40.7 जेऊर – 40.0 पुणे – 39.1 नाशिक – 39.2 जालना – 39.8 जळगाव – 41.4 मुंबई – 35.8

गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध शहरातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता उष्माघातापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक झालं आहे. त्यामुळे उष्माघात होऊ नये यासाठी काय करावं, उष्माघाताची लक्षणं काय आणि उष्माघातावर काय उपचार करावा हे माहीत असणे गरजेचं आहे.

उष्माघाताची लक्षणं कशी ओळखाल?

  • चक्कर येणे
  • डोकं दुखणे
  • सुस्ती आल्यासारखं वाटणे आणि डोकं हलकं झाल्यासारखं वाटणे
  • गरम होत असूनही घाम न येणे
  • त्वचा लालसर होणे
  • त्वचा कोरडी पडणे
  • अशक्तपणा जाणवणे
  • मळमळ होणे, उलट्या होणे
  • जोरात श्वास घेणे
  • हृदयाचे ठोके वाढणे

जर कधी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणामध्ये ही वरील लक्षणं दिसून आली. तर त्याला उष्माघाताचा त्रास होतो आहे हे समजावं आणि त्याला तातडीने उपचार उपलब्ध करुन द्यावी.

उष्माघातापासून बचाव होण्यासाठी काय करावे?

  • भरपूर प्रमाणात पाणी प्या, दररोज 8 ग्लास पाणी प्यायला हवं, ते शरीरासाठी आवश्यक आहे
  • अंघोळ करताना थंड पाण्याचा वापर करा, त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहील
  • हलका पण पौष्टिक आहार घ्या, आहारात काकडी, कलिंगड, ताक यांसारख्या थंड पदार्थांचा समावेश करा
  • सुती कपड्यांचा वापर करा
  • बराच वेळ उन्हात राहावं लागत असेल तर त्वचेवर पाणी शिंपडत राहा, तसेच थोड्या थोड्या वेळानी पाणी प्या
  • दुपारचं बाहेर पडणं टाळा, विशेषकरुन सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत बाहेर उन्हात पडू नका
  • उन्हात असाल तर टोपी, छत्री, स्कार्फ यांचा वापर करा
  • अतिरिक्त मद्यमान, साखर असलेले पेय किंवा कॅफेन असलेले पेय टाळा, यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते
  • अतिप्रमाणात व्यायाम करणं टाळा

संबंधित बातम्या :

सूर्य आग ओकतोय! चंद्रपुरात तब्बल 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तुमच्या शहरात काय स्थिती?

Summer Foods : उन्हाळ्यात डायटमध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करा, मिळवा भरपूर फायदे

Temperatures above 40 degrees Celsius in many districts of Vidarbha and Marathwada

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.