AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृहिणींचे बजेट कोलमडले!; जाणून घ्या किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे भाव

पावसामुळे टोमॅटो अधिक लालबुंद झाला. मिरचीच्या तिखटपणासाठीदेखील अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागत आहे.

गृहिणींचे बजेट कोलमडले!; जाणून घ्या किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे भाव
| Updated on: Jun 29, 2023 | 5:39 PM
Share

ठाणे : पावसाला सुरुवात झाली. तत्पूर्वी उन्हाळा होता. त्यामुळे भाज्यांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. उत्पादन कमी झाले. मागणी नेहमीसारखीच आहे. या कारणामुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वत्र पावसाचे जोरदार आगमन होत आहे. मात्र या पावसामुळे गृहिणींचे बजेट चांगलेच कोलमडले. भाज्यांचे भाव गगनाला भिडले. सामान्य माणसाच्या खिशाला चांगलीच फोडणी बसत आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव वाढले असल्याचे दुकानदारांनी सांगितले. तर 50 ग्राहक येतात भाव विचारतात आणि त्यापैकी फक्त एखादा दुसरा ग्राहक भाजीपाला घेऊन जातो अशी माहितीही भाजी विक्रेत्यांनी दिली आहे.

पावसामुळे टोमॅटो अधिक लालबुंद झाला. मिरचीच्या तिखटपणासाठीदेखील अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागत आहे. कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र भाज्यांचे भाव ऐकून नागरिक भुवया उंचावताना दिसतात.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे भाव ( प्रतिकिलो)

टोमॅटो 70 ते 100

भेंडी 60 ते 80

दुधी भोपळा 50 ते 60

फरसबी 100 ते 120

फ्लावर 50 ते 60

गवार 60 ते 80

घेवडा 100 ते 120

काकडी 60 ते 70

कारली 60 ते 70

कोबी 50 ते 60

ढोबळी मिरची 60 ते 80

शेवग्याची शेंग 80 ते 100

वाटाणा 100 ते 120

वांगी 60 ते 70

मिरची 100 ते 120

धुळ्यातही भाजीपाल्याचे दर गगनाला

धुळे शहरात पाऊस लांबल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. गेल्या आठवड्यात 20 ते 30 रुपये किलोने मिळणारा भाजीपाला तब्बल 100 रुपये किलोपर्यंत मिळत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. जून महिना उलटायला आला मात्र पाऊस न झाल्याने धुळे शहरात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात 20 ते 30 रुपये किलोने भेटणारा भाजीपाला हा आता तब्बल 100 रुपये पर गेला आहे.

तीस रुपये किलो भेटणारी कोथंबिर 160 रुपये किलो, दहा रुपये किलो भेटणारे टमाटे 80 रुपये, गिलके 80, मिरची 100 रुपये, अद्रक १२० वांगे 80 किलो दराने मिळत आहेत. सध्या शहारालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. मात्र पाऊस नसल्याने गावांमधील भाजीपालाची आवक घटली आहे. शहरात नाशिक मंचर वाशी येथील भाजीपाला विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.