AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृहिणींचे बजेट कोलमडले!; जाणून घ्या किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे भाव

पावसामुळे टोमॅटो अधिक लालबुंद झाला. मिरचीच्या तिखटपणासाठीदेखील अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागत आहे.

गृहिणींचे बजेट कोलमडले!; जाणून घ्या किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे भाव
| Updated on: Jun 29, 2023 | 5:39 PM
Share

ठाणे : पावसाला सुरुवात झाली. तत्पूर्वी उन्हाळा होता. त्यामुळे भाज्यांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. उत्पादन कमी झाले. मागणी नेहमीसारखीच आहे. या कारणामुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वत्र पावसाचे जोरदार आगमन होत आहे. मात्र या पावसामुळे गृहिणींचे बजेट चांगलेच कोलमडले. भाज्यांचे भाव गगनाला भिडले. सामान्य माणसाच्या खिशाला चांगलीच फोडणी बसत आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव वाढले असल्याचे दुकानदारांनी सांगितले. तर 50 ग्राहक येतात भाव विचारतात आणि त्यापैकी फक्त एखादा दुसरा ग्राहक भाजीपाला घेऊन जातो अशी माहितीही भाजी विक्रेत्यांनी दिली आहे.

पावसामुळे टोमॅटो अधिक लालबुंद झाला. मिरचीच्या तिखटपणासाठीदेखील अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागत आहे. कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र भाज्यांचे भाव ऐकून नागरिक भुवया उंचावताना दिसतात.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे भाव ( प्रतिकिलो)

टोमॅटो 70 ते 100

भेंडी 60 ते 80

दुधी भोपळा 50 ते 60

फरसबी 100 ते 120

फ्लावर 50 ते 60

गवार 60 ते 80

घेवडा 100 ते 120

काकडी 60 ते 70

कारली 60 ते 70

कोबी 50 ते 60

ढोबळी मिरची 60 ते 80

शेवग्याची शेंग 80 ते 100

वाटाणा 100 ते 120

वांगी 60 ते 70

मिरची 100 ते 120

धुळ्यातही भाजीपाल्याचे दर गगनाला

धुळे शहरात पाऊस लांबल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. गेल्या आठवड्यात 20 ते 30 रुपये किलोने मिळणारा भाजीपाला तब्बल 100 रुपये किलोपर्यंत मिळत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. जून महिना उलटायला आला मात्र पाऊस न झाल्याने धुळे शहरात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात 20 ते 30 रुपये किलोने भेटणारा भाजीपाला हा आता तब्बल 100 रुपये पर गेला आहे.

तीस रुपये किलो भेटणारी कोथंबिर 160 रुपये किलो, दहा रुपये किलो भेटणारे टमाटे 80 रुपये, गिलके 80, मिरची 100 रुपये, अद्रक १२० वांगे 80 किलो दराने मिळत आहेत. सध्या शहारालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. मात्र पाऊस नसल्याने गावांमधील भाजीपालाची आवक घटली आहे. शहरात नाशिक मंचर वाशी येथील भाजीपाला विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.