AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुराचा फटका, 6 हजार लिटर पेट्रोलमध्ये पाणी शिरलं, बदलापुरात पेट्रोलपंपाचं प्रचंड नुकसान

बदलापूर शहराला गुरुवारी (22 जुलै) उल्हास नदीच्या पुराचा मोठा तडाखा बसला. या पुरात बदलापूरच्या नायरा पेट्रोल पंपाला मोठा फटका बसला आहे.

पुराचा फटका, 6 हजार लिटर पेट्रोलमध्ये पाणी शिरलं, बदलापुरात पेट्रोलपंपाचं प्रचंड नुकसान
पुराचा फटका, 6 हजार लिटर पेट्रोलमध्ये पाणी शिरलं, बदलापुरात पेट्रोलपंपाचं प्रचंड नुकसान
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 9:18 PM
Share

बदलापूर (ठाणे) : बदलापूर शहराला गुरुवारी (22 जुलै) उल्हास नदीच्या पुराचा मोठा तडाखा बसला. या पुरात बदलापूरच्या नायरा पेट्रोल पंपाला मोठा फटका बसला आहे. या पंपावर तब्बल 6 फूट पाणी साचलं होतं. त्यामुळे पंपावरील भूमिगत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे पेट्रोल पंपाचं लाखोचं नुकसान झालं आहे.

बदलापूर शहरात शिरल्यानंतर सर्वात पहिला फटका पेट्रोलपंपाला

बदलापूरच्या उल्हास नदीच्या चौपाटीला लागूनच नायरा कंपनीचा नव्यानंच उभारण्यात आलेला पेट्रोलपंप आहे. गुरुवारी उल्हास नदीच्या पुराचं पाणी बदलापूर शहरात शिरल्यानंतर सर्वात पहिला फटका हा या नायरा पेट्रोलपंपाला बसला. या पंपावर पुरामुळे तब्बल 6 फूट पाणी जमा झालं होतं. या पंपाचे फोटो आणि व्हिडीओ काल दिवसभर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर आज सकाळी पाणी ओसरल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ने या पेट्रोलपंपावर जाऊन आढावा घेतला. यावेळी या पंपाचं पुरामुळे मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं.

पेट्रोलपंप पुन्हा कधी सुरु होणार?

पंपावरील भूमिगत टाक्यांमध्ये 6 हजार लिटर पेट्रोल होतं. तर अडीच हजार लिटर डिझेल होतं. या सगळ्यामध्ये पाणी जाऊन मोठं नुकसान झालं आहे. आता पेट्रोलपंप पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी किमान 8 ते 10 दिवस लागणार असल्याची माहिती पेट्रोल पंप व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली.

बदलापुरात जलशुद्धीकरण प्रकल्पातही पाणी शिरलं

बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बॅरेज जलशुद्धीकरण प्रकल्पात कालच्या (22 जुलै) पुरामुळे उल्हास नदीचं पाणी घुसलं. त्यामुळे या प्रकल्पातील फिल्टरेशन प्लॅन्ट अजूनही पाण्याखाली आहे. त्यामुळे पुराच्या संकटानंतर आता बदलापूरकरांवर ‘पाणी’संकट ओढवलं आहे. मुसळधार पावसामुळे गुरुवारी (22 जुलै) उल्हास नदीला पूर आला. या पुरात उल्हास नदीने 20.30 मीटरची पातळी गाठली होती. त्यामुळे बॅरेज धरणाच्या भिंतीवरून पाणी आत घुसण्यासाठी फक्त एक वीत अंतर शिल्लक होतं. मात्र तरीही बुधवारी मध्यरात्री खालच्या बाजूने जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी घुसलं. या पाण्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पातील तिन्ही प्रक्रिया केंद्रात गढूळ पाणी शिरलं आणि प्रकल्प ठप्प झाला.

हेही वाचा :

आधी उल्हास नदीला पूर, आता जलशुद्धीकरण प्रकल्प बंद, बदलापूरकरांवर ‘पाणी’ संकट

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.