AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Attack : डोंबिवलीतील पत्रकार हल्ला प्रकरणी चार जणांना अटक, म्होरक्याचा पोलिसांकडून शोध सुरु

ज्या रिक्षातून हे आरोपी पळून गेले होते ती रिक्षा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने शोधून काढली. रिक्षा शोधल्यानंतर या प्रकरणातील आरोपी विशाल खांडेकर, अमोल सावंत, अनच आंग्रे यांना ताब्यात घेऊन टिळकनगर पोलिसांच्या हवाली केले. तरुणीलाही टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Dombivali Attack : डोंबिवलीतील पत्रकार हल्ला प्रकरणी चार जणांना अटक, म्होरक्याचा पोलिसांकडून शोध सुरु
डोंबिवलीतील पत्रकार हल्ला प्रकरणी चार जणांना अटक
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 7:23 PM
Share

डोंबिवली : पत्रकार श्रीराम कांदू(Shriram Kandu) हल्ला प्रकरणी कल्याण क्राईम ब्रांच(Kalyan Crime Branch)ने चार आरोपींना अटक केली असून या हल्ल्याचा म्होरक्या गौरव शर्माचा पोलीस शोध घेत आहेत. कांदू यांना मारहाण करण्यासाठी गौरव शर्मा याला कोणी आणि का सांगितले होते ? याचा खुलासा गौरव शर्माच्या अटकेनंतरच होणार आहे. कल्याण डोंबिवलीत गेल्या 30 वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात असलेले श्रीराम कांदू हे व्यावसायिक पण आहेत. त्यांचे डोंबिवलीतील टिळकनगर येथे स्वीट मार्टचे दुकान आहे. दिवसातून दोन तास ते त्या दुकानात बसतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी कांदू हे दुकानात बसले होते. एक तरुणी त्यांच्या दुकानात आली. तिने काही वस्तू खरेदी केल्या. बाहेर जाताना तिने दोन लोकांना कांदू यांच्या दिशेने इशारा केला. दोन जणांनी दुकानात घूसून कांदू यांना मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. या प्रकरणाचा तपास टिळकनगर पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेचा तपास क्राईम ब्रांच पोलीस सुद्धा करीत होते. (Four arrested in Dombivali journalist attack case, Police start searching for the main accused)

सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपी अटक, म्होरक्याचा शोध सुरु

डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी या घटनेचा निषेध करीत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. कल्याण क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट यांनी पथक नेमून आरोपींना शोधण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. पोलीस अधिकारी भूषण दायमा, मोहन कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी गुरुनाथ जरग, विश्वनाथ माने, बालाजी शिंदे, गोरक्षक शेगडे यांच्या पथकाला मोठे यश आले. ज्या रिक्षातून हे आरोपी पळून गेले होते ती रिक्षा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने शोधून काढली. रिक्षा शोधल्यानंतर या प्रकरणातील आरोपी विशाल खांडेकर, अमोल सावंत, अनच आंग्रे यांना ताब्यात घेऊन टिळकनगर पोलिसांच्या हवाली केले. तरुणीलाही टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चार आरोपी अटक झाले आहेत.

पोलीस तपासानंतरच हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल

आरोपींना गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीने कांदूवर हल्ला करण्यास सांगितले होते. गौरव शर्मा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे. त्याने असे का आणि कोणाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केले आहे की यामागे काही राजकीय षडयंत्र किंवा भूमाफियांचा हात आहे का ? याचा खुलासा गौरव शर्माच्याअटकेनंतर होणार आहे. कांदू यांनी आयुष्यभर चांगली पत्रकारीता आणि समाजाच्या भल्यासाठी काम केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपासही पोलिसांनी करावा अशी मागणी केली आहे. (Four arrested in Dombivali journalist attack case, Police start searching for the main accused)

इतर बातम्या

Pimri chinchwad crime | खोट्या गुन्ह्याच्या आरोपामुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यू नगरसेविकेच्या आरोपामुळे खळबळ ; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

दुदैवी घटना ! राजमाची किल्यालगतच्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरून पडून ट्रेकर्सचा मृत्यू ; आठवड्यातील दुसरी घटना

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.