AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Attack : डोंबिवलीतील पत्रकार हल्ला प्रकरणी चार जणांना अटक, म्होरक्याचा पोलिसांकडून शोध सुरु

ज्या रिक्षातून हे आरोपी पळून गेले होते ती रिक्षा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने शोधून काढली. रिक्षा शोधल्यानंतर या प्रकरणातील आरोपी विशाल खांडेकर, अमोल सावंत, अनच आंग्रे यांना ताब्यात घेऊन टिळकनगर पोलिसांच्या हवाली केले. तरुणीलाही टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Dombivali Attack : डोंबिवलीतील पत्रकार हल्ला प्रकरणी चार जणांना अटक, म्होरक्याचा पोलिसांकडून शोध सुरु
डोंबिवलीतील पत्रकार हल्ला प्रकरणी चार जणांना अटक
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 7:23 PM
Share

डोंबिवली : पत्रकार श्रीराम कांदू(Shriram Kandu) हल्ला प्रकरणी कल्याण क्राईम ब्रांच(Kalyan Crime Branch)ने चार आरोपींना अटक केली असून या हल्ल्याचा म्होरक्या गौरव शर्माचा पोलीस शोध घेत आहेत. कांदू यांना मारहाण करण्यासाठी गौरव शर्मा याला कोणी आणि का सांगितले होते ? याचा खुलासा गौरव शर्माच्या अटकेनंतरच होणार आहे. कल्याण डोंबिवलीत गेल्या 30 वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात असलेले श्रीराम कांदू हे व्यावसायिक पण आहेत. त्यांचे डोंबिवलीतील टिळकनगर येथे स्वीट मार्टचे दुकान आहे. दिवसातून दोन तास ते त्या दुकानात बसतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी कांदू हे दुकानात बसले होते. एक तरुणी त्यांच्या दुकानात आली. तिने काही वस्तू खरेदी केल्या. बाहेर जाताना तिने दोन लोकांना कांदू यांच्या दिशेने इशारा केला. दोन जणांनी दुकानात घूसून कांदू यांना मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. या प्रकरणाचा तपास टिळकनगर पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेचा तपास क्राईम ब्रांच पोलीस सुद्धा करीत होते. (Four arrested in Dombivali journalist attack case, Police start searching for the main accused)

सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपी अटक, म्होरक्याचा शोध सुरु

डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी या घटनेचा निषेध करीत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. कल्याण क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट यांनी पथक नेमून आरोपींना शोधण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. पोलीस अधिकारी भूषण दायमा, मोहन कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी गुरुनाथ जरग, विश्वनाथ माने, बालाजी शिंदे, गोरक्षक शेगडे यांच्या पथकाला मोठे यश आले. ज्या रिक्षातून हे आरोपी पळून गेले होते ती रिक्षा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने शोधून काढली. रिक्षा शोधल्यानंतर या प्रकरणातील आरोपी विशाल खांडेकर, अमोल सावंत, अनच आंग्रे यांना ताब्यात घेऊन टिळकनगर पोलिसांच्या हवाली केले. तरुणीलाही टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चार आरोपी अटक झाले आहेत.

पोलीस तपासानंतरच हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल

आरोपींना गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीने कांदूवर हल्ला करण्यास सांगितले होते. गौरव शर्मा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे. त्याने असे का आणि कोणाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केले आहे की यामागे काही राजकीय षडयंत्र किंवा भूमाफियांचा हात आहे का ? याचा खुलासा गौरव शर्माच्याअटकेनंतर होणार आहे. कांदू यांनी आयुष्यभर चांगली पत्रकारीता आणि समाजाच्या भल्यासाठी काम केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपासही पोलिसांनी करावा अशी मागणी केली आहे. (Four arrested in Dombivali journalist attack case, Police start searching for the main accused)

इतर बातम्या

Pimri chinchwad crime | खोट्या गुन्ह्याच्या आरोपामुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यू नगरसेविकेच्या आरोपामुळे खळबळ ; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

दुदैवी घटना ! राजमाची किल्यालगतच्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरून पडून ट्रेकर्सचा मृत्यू ; आठवड्यातील दुसरी घटना

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.