AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमधील तोडफोड प्रकरणी चौघे जण ताब्यात, आरोपींना पकडण्यासाठी तीन पोलीस पथके

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढली आहे. चक्कीनाका, खडेगोळवली, कैलास नगर, चिकणीपाडा या परिसरात रात्रीच्या वेळेस टवाळखोर तरुण विनाकारण नागरिकांना त्रास देतात.

कल्याणमधील तोडफोड प्रकरणी चौघे जण ताब्यात, आरोपींना पकडण्यासाठी तीन पोलीस पथके
कल्याणमधील तोडफोड प्रकरणी चौघे जण ताब्यात
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 10:06 PM
Share

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात काही तरुणांकडून दुकाने आणि वाहनांची तोडफोड करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोळसेवाडी परिसरात आरोपींना आळा घालण्यासाठी सर्व फरार आरोपींना पकडण्यासाठी तीन पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यात एकूण 17 आरोपी फरार आहेत. काही दिवसांपासून कोळसेवाडी परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांच्या विरोधात ठोस पावले उचलली जाणार अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे. (Four persons arrested in vandalism case in Kalyan, three police squads to nab accused)

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढली आहे. चक्कीनाका, खडेगोळवली, कैलास नगर, चिकणीपाडा या परिसरात रात्रीच्या वेळेस टवाळखोर तरुण विनाकारण नागरिकांना त्रास देतात. रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मद्यधुंद अवस्थेत तरुण घराबाहेर पडतात. दारूच्या नशेत निष्पाप नागरिकांना मारहाण करतात, वाहनांची तोडफोड करतात, पोलीस कारवाई करतात. मात्र या टवाळखोर तरुणांना राजकीय पाठबळ असल्याने पोलिसांकडून ठोस पावले उचलण्यात अडचणी येतात. यामुळे तरुणांची डेरिंग वाढते आणि या तरुणांकडून गैर प्रकार घडतात.

गुरुवारी संध्याकाळी दुकान आणि वाहनाची केली तोडफोड

कल्याणच्या कैलास नगर परिसरात गुरुवारी संध्याकाळी विनाकारण काही तरुणांनी एका दुकानात आणि एका वाहनाची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीव्ही नाईनने ही बातमी दाखवली होती. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले. यातील फक्त एक आरोपी सज्ञान होता. बाकी इतर तीन आरोपी अल्पवयीन होते. मात्र या घटनेनंतर कल्याण परिमंडळ 3 डीसीपी विवेक पानसरे यांनी गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांना आदेश दिले. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात फरार असलेल्या आरोपींची धरपकड करण्यासाठी पोलिसांची तीन पथक नेमण्यात आली आहेत. लवकरात लवकर वॉन्टेड आरोपी पकडले पाहिजे यासाठी पोलीस टीम सज्ज झाली आहे. यापुढेही ठोस पावले उचलले जातील असे एसीपी अनिल पोवार यांनी सांगितले. (Four persons arrested in vandalism case in Kalyan, three police squads to nab accused)

इतर बातम्या

शेतकऱ्यांनो नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत दाखल करा, नुकसानभरपाईसाठी कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या

नितेश राणे आणि नीलम राणे विरोधात लूकआऊट सर्क्युलर, गृहमंत्री वळसे-पाटील काय म्हणाले?

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.