AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोटिंगसाठी पर्यटकांची गर्दी, सुरक्षेचे नियम किती पाळले जातात?, आयुक्तांनी दिला हा इशारा

पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पर्यटकांच्या जीवाशी खेळ कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बोटिंगसाठी पर्यटकांची गर्दी, सुरक्षेचे नियम किती पाळले जातात?, आयुक्तांनी दिला हा इशारा
| Updated on: May 25, 2023 | 8:21 PM
Share

सुनील जाधव, प्रतिनिधी, ठाणे : उन्हाचे दिवस असल्याने पाणी बहुतेकांना हवेहवेसे वाटते. त्यामुळे बोटिंगसाठी बरेच पर्यटक येतात. पण, बोटिंग करत असताना त्यांना सुरक्षा जॅकेट पुरवले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पर्यटकांच्या जीवाशी खेळ कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तलावांचे शहर म्हणून ओळख आलेल्या ठाणे शहरातील मासुंदा, उपवन, आंबे-घोसाळे आणि खारीगाव या तलावांवर महापालिकेच्यावतीने बोटींग सुविधा उपलब्ध आहे. सध्या सुट्ट्यांमुळे बोटिंगला गर्दी होताना दिसत आहे.

लहान मुलांना शाळेला लागलेल्या सुट्ट्या आणि मुलांच्या विरंगुळ्यासाठी पालक आपल्या पाल्यांना पर्यटक स्थळ म्हणून बोटिंग करताना घेऊन जाताना पाहायला मिळतात. या पर्यटकांना आवश्यक ती काळजी घेऊन सुरक्षेची साधने उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.

मर्यादेपेक्षा जास्त पर्यटक

अपघात होऊनही दुर्देवी घटना घडणार नाही, हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र बोटिंग सुविधेच्या ठेकेदाराकडे सुरक्षा साहित्य उपलब्ध असताना देखील ते वापरले जात नाही. किंबहुना मर्यादेपेक्षा जास्त पर्यटकांची संख्या बोटिंगसाठी घेतली जाते. अशा तक्रारी आल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने दखल घेतली.

thane 2 n

ठेकेदाराकडून केराची टोपली

बोटिंगदरम्यान सुरक्षा जॅकेट आणि नियमांचे पालन न केल्यास संबंधित विभाग तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र या आदेशाला ठेकेदारांकडून केराची टोपली दाखवण्याचे काम केले जात आहे.

आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले असले तरी ठेकेदार हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लागणारे लाईफ जॅकेटची पूर्तता करताना दिसून येत नाही. अनेक लहान मुले आणि वयोवृध्द हे बोटीतून बिना सुरक्षेच्या प्रवास करताना दिसून येत आहे. ठेकेदारांमध्ये आयुक्तांची भीती उरलीच नाही का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.