AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारखान्यातून सुटी झाल्यावर तीन कामगार घरी जात होते, कंटेनरला दुचाकी धडकली आणि…

रस्त्याच्या बाजूला कंटेनर उभा होता. हा कंटेनर रात्रीची वेळ असल्याने दुचाकी चालकाला दिसला नाही. त्याने थेट कंटेनरला धडक दिली. यामुळे भीषण अपघात झाला.

कारखान्यातून सुटी झाल्यावर तीन कामगार घरी जात होते, कंटेनरला दुचाकी धडकली आणि...
| Updated on: Jun 11, 2023 | 3:05 PM
Share

प्रतिनिधी, पालघर : तीन कामगार एकाच कारखान्यात काम करायचे. काम आटोपून काल रात्री ते घरी परत येत होते. पण, रस्त्याच्या बाजूला कंटेनर उभा होता. हा कंटेनर रात्रीची वेळ असल्याने दुचाकी चालकाला दिसला नाही. त्याने थेट कंटेनरला धडक दिली. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. या दुर्घटनेमुळे तिन्ही कामगारांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर पसरले आहे. तिघेही आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते.

दुचाकी उभ्या कंटेनरला धडकली

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्घटना घडली. सातीवली येथे भरधाव बाईकने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात बाईकवरील ट्रिपल सीट असलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

तिन्ही मृतक कारखान्यातील कामगार

मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर रात्रीच्या सुमारास उभ्या कंटेनरला या भरधाव बाईकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात विक्रमगड तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे तिन्ही मृतक वसईतील एका कारखान्यातील कामगार असल्याची माहिती समोर आली.

या तिघांचा झाला मृत्यू

कारखान्यातून सुट्टी झाल्यावर घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात नरेश लाडक्या भोईर (वय 22 रा. करसोड), सूरज राघ्या ठाकरे (वय 18 रा. डोल्हारी बुद्रुक), मयूर विनोद ठाकरे (रा .17 डोल्हारी बुद्रुक) या तिघांचा मृत्यू झाला.

तिघेही कामगार एका गाडीने परत येत होते. यावेळी हा अपघात झाला. चालकाच्या नजरेत समोरील कंटेनर दिसला नाही. त्यामुळे भीषण अपघात झाला. अपघातानंतर तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तीन कामगार कुटुंब उघड्यावर पडले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.