AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंब्रा बायपास रस्त्यावर एक एप्रिलपासून वाहनांना बंदी, असा केलाय बदल ?

पुलाचे दुरुस्तीचे काम किती चालणार आहे, याबाबत प्रशासनाने कसल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. त्याचबरोबर पूल काम झाल्यानंतर किती दिवस बंद ठेवणार हे सुद्धा अद्याप जाहीर केलेले नाही.

मुंब्रा बायपास रस्त्यावर एक एप्रिलपासून वाहनांना बंदी, असा केलाय बदल ?
Mumbra Bypass RdImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 30, 2023 | 11:58 AM
Share

निखिल चव्हाण, ठाणे : मुंब्रा बायपास (Mumbra Bypass Rd) रेतीबंदर जवळील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 एप्रिल पासून हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. जेएनपीटी (JNPT), कळंबोलीकडून भिवंडी, नाशिक, गुजरात व उत्तर भारतात जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुंब्रा बायपास बाह्यवळण रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्या मार्गावरून येणारी जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत १ एप्रिलपासून (1 april) बदल करण्यात आले आहेत.

पुलाच्या स्लॅबवर उच्चशक्ती काँक्रीटचं काम होणार

तर ही वाहतूक ठाणे शहरअंतर्गत परिसरातून राज्यांतर्गत व बाहेरील राज्यातून मुंब्रा बायपास मार्गे जेएनपीटी, कळंबोली नवी मुंबईकडून भिवंडी, नाशिक, गुजरातकडे राज्य महामार्ग क्र ३ अथवा घोडबंदर रोडने जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. मुंब्रा बायपास रेतीबंदर जवळील मुंब्रा कौसा बायपास रस्ता मधील रेल्वे उड्डाणपुलाची दुरुस्ती व पुलाच्या स्लॅबवर उच्चशक्ती काँक्रीटचं काम करण्यात येणार आहे. तसेच खारेगाव व साकेत पुलाचे मास्टीक पध्दतीने डांबरीकरण व क्षतिग्रस्त एक्सपांशन जॉईंट्स दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग अद्याप जाहीर…

पुलाचे दुरुस्तीचे काम किती चालणार आहे, याबाबत प्रशासनाने कसल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. त्याचबरोबर पूल काम झाल्यानंतर किती दिवस बंद ठेवणार हे सुद्धा अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे १ एप्रिलपासून त्या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनांना वेगळ्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. अद्याप पर्यायी मार्ग प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर तिथं अधिक दिवस काम चालणार असल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.