AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! पालघरमध्ये वर्षभरानंतर कोरोनामुळे पहिला मृत्यू, व्हेंटिलेटरमुळे घात?; नातेवाईकांचे गंभीर आरोप काय?

पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसे न् दिवस वाढ होत आहे. कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात उपचार गेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. पण तिला ऑक्सिजन पुरवठा न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

मोठी बातमी ! पालघरमध्ये वर्षभरानंतर कोरोनामुळे पहिला मृत्यू, व्हेंटिलेटरमुळे घात?; नातेवाईकांचे गंभीर आरोप काय?
coronaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2023 | 12:59 PM
Share

पालघर : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणांचं टेन्शन वाढलं आहे. महाराष्ट्रासह दिल्ली आणि केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यात उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असतानाच पालघरमध्ये कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे. वर्षभरानंतरचा कोरोनाचा हा पहिला बळी आहे. रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

पालघर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हेल्थ युनिट या डेडिकेटेड कोविड हेल्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने तिचे निधन झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवणारी ठरणार असल्याचे दिसत आहे. असं असतानाच व्हेंटिलेटरचा योग्य वापर होत नसल्याने आरोग्य विभाग कोरोना बाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

मुंबईला नेण्याआधीच मृत्यू

बुधवारी दुपारी बोईसर शासकीय टीमा रुग्णालयात परिसरातील वाळवा या गावातील एका 55 वर्षीय महिलेला श्वसनाला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना पालघर रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथेही त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्याची तयारी सुरू असताना तिचा त्रास वाढू लागला. परिणामी या महिलेचा मृत्यू झाला. सदर महिला ही खूप गंभीर अवस्थेत असल्याने व्हेंटिलेटर लावण्यात आले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश बोदाडे ह्यानी सांगितले.

तसेच रुग्णालयाने वेळेत व्हेंटिलेटर लावले असते तर महिलेचा जीव वाचला असता, असं या महिलेच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. सध्या पालघर शहरातील ग्रामीण रुग्णालय शेजारी असलेल्या हेल्थ युनिट या डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

98 रुग्णांवर उपचार सुरू

सध्या पालघर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या  98 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 29 रुग्णांवर उपचार सुरू होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज सरासरी 7 रुग्ण तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 5 रुग्ण आढळून येत होते. तर या आठवड्यात ग्रामीण भागात एक तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 8 असे एकूण 9 रुग्ण दररोज आढळून येत आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण संख्या पालघर तालुक्यात असून ही संख्या 37 आहे. त्याखालोखाल डहाणू तालुक्यात चार, तलासरी, विक्रमगड आणि वाडा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात गुरुवारपर्यंत 44 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात 21 करोना बाधित आढळून आले असून जिल्ह्यातील ही संख्या 65 झाली आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.