AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chalisgaon Crime : चाळीसगावमध्ये दोन चिमुकल्यांसह आईचा मृत्यूदेह विहिरीत आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट

जळगावमध्ये चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात अनिल रामू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह आढळून आला. अनिल रामू चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या विहिरीत हे मृतदेह पाहिल्यानंतर त्याने ही माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दिली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठले व पंचनामा करून मृतदेह बाहेर काढले.

Chalisgaon Crime : चाळीसगावमध्ये दोन चिमुकल्यांसह आईचा मृत्यूदेह विहिरीत आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट
चाळीसगावमध्ये दोन चिमुकल्यांसह आईचा मृत्यूदेह विहिरीत आढळलाImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 01, 2022 | 12:36 AM
Share

चाळीसगाव / खेमचंद कुमावत (प्रतिनिधी) : चाळीसगावातील रांजणगाव शिवारामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. दोन लहान चिमुकल्यांसह आईचा मृतदेह (Deadbody) विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. इला मनोज पावरा (25) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तिन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दरम्यान, ही आत्महत्या (Suicide) आहे की हत्या (Murder) याबाबत संभ्रम आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे पावरा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तिघांच्याही मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट

जळगावमध्ये चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात अनिल रामू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह आढळून आला. अनिल रामू चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या विहिरीत हे मृतदेह पाहिल्यानंतर त्याने ही माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दिली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठले व पंचनामा करून मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णलयामध्ये पाठवले. या मृत व्यक्तींची ओळख पटली आहे. मयत महिलेचे कुटुंब हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नवागढमध्ये येथील आहे. गेल्या चार वर्षापासून हे कुटुंब रांजणगाव येथील शेतकरी बापूराव गिरधर चौधरी यांच्या शेतात सालाने काम करत होते. या संपूर्ण घटनेबाबत परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मात्र ही आत्महत्या की अपघात की आणखी दुसरंच काही हे अजूनही कळू शकलेले नाही. या तिघांच्याही मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. या संदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. (The body of a mother with two children was found in a well in Chalisgaon)

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?