AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बाळासाहेब कधी मरतात याची ‘ते’ वाट पाहात होते”, आमदार संजय गायकवाड यांचा सर्वात मोठा गंभीर आरोप

उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिवसेनेकडून (शिंदे गट) दररोज त्यांच्यावर टीका आणि आरोप केले जात आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर आता सर्वात मोठा आणि भयानक आरोप करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी हा आरोप केला आहे.

बाळासाहेब कधी मरतात याची 'ते' वाट पाहात होते, आमदार संजय गायकवाड यांचा सर्वात मोठा गंभीर आरोप
BALASAHEB AND UDDHAV Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 16, 2023 | 5:55 PM
Share

बुलढाणा | 16 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकारण संपविण्याचे प्रयत्न आपल्याच परिसरातून झाले असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. अजित पवार यांच्यामध्ये चांगले गुण आहेत. त्यामुळेच शरद पवार यांनी त्यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवले. अजित दादा हे स्पष्ट वक्ता आहेत. राष्ट्रवादीमध्ये अजित दादा वरचढ ठरत होते. त्यामुळेच शरद पवार यांनी राजीनाम्याचा ड्रामा केला. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदही दिले नाही. त्यामुळे अजित पवार आमच्यासोबत आले असा दावाही आमदार गायकवाड यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाणून बुजून नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. तेव्हा सरकारने त्यांना झेड संरक्षण देण्याचे ठरवलं. मात्र, तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह मंत्रालयाला फोन करून एकनाथ शिंदे यांना संरक्षण देऊ नका असे सांगितलं होते. मोताळा येथे एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड बोलत होते.

छत्रपती संभाजी राजे यांच्या घरात बैठक चालू असताना उद्धव ठाकरे यांचा फोन आला आणि एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा द्यायची नाही असा आदेश दिला होता. हा एकप्रकारे शिंदे यांना नक्षल्यांकडून संपवण्याचा कट शिजविण्यात आला होता असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की बाळासाहेब कधी मरतात याची उद्धव ठाकरे वाट पाहत होते. ज्या बाळासाहेबांना जगातले लोक मानतात. त्या बाळासाहेबांच्या मृत्यूची वाट मातोश्रीमधील लोक पाहत होते. त्याची बातमी आज बाहेर आलीय, असा गौप्यस्फोटही आमदार गायकवाड यांनी यावेळी केला.

मातोश्रीमधून अनेक नेत्यांना हाकलून लावण्यात आले. ज्यांनी शिवसेना वाढविली त्यांनाच त्यांच्या घरातून हाकलले गेले. राज ठाकरे, नारायण राणे, रामदास कदम आणि आता एकनाथ शिंदे यांचाही त्या नेत्यांमध्ये समावेश आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...