AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणासाठी थांबले अन् घात झाला, भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; 70 लोक दबल्याची भीती

भिवंडीच्या वलपाडा येथे तीन मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 60 ते 70 जण दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केलं आहे.

जेवणासाठी थांबले अन् घात झाला, भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; 70 लोक दबल्याची भीती
building collapsesImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 29, 2023 | 2:24 PM
Share

भिवंडी : भिवंडीत अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. भिवंडीतील वलपाडा येथे एक तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, इमारतीखाली 60 ते 70 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशम दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदत कार्यास सुरुवात केली आहे. इमारतीचा ढिगारा उपसला जात असून त्याखालून लोकांना काढलं जात आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. ही इमारत जुनी असल्याचं सांगितलं जात आहे.

आज दुपारी 12 वाजता ही दुर्देवी घटना घडली. भिवंडीच्या वलपाडा येथे वर्धमान नावाची इमारत आहे. ही तळमजला अधिक तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या खाली गोडाऊन होता. तर इमारतीच्या वरच्या तिन्ही मजल्यावर लोक राहत होते. या गोदामात 30 ते 35 लोक काम करत असल्याची माहिती मिळते. दुपारी अचानक इमारती कोसळली आणि हे सर्व कामगार इमारतीखाली गाडले गेल्याचं सांगितलं जातं. तसेच इमारतीतील इतर रहिवासीही या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत.

धडाम आवाज आला आणि लोक पळाले

इमारत पडल्यानंतर धडाम धडाम असा आवाज आला. लोकांना वाटलं कसला तरी आवाज असेल. त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्याने धडाम असा आवाज आला आणि अचानक धुराळा उडाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात धूळच धूळ झाली. त्यामुळे लोक सावध झाले आणि आवाजाच्या दिशेने धावले. तोपर्यंत ही संपूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळून जमीनदोस्त झाली होती. इमारत कोसळल्यानंतर एकच हाहाकार उडाला. आक्रोश आणि मातम सुरू झाला. काही लोक वाचवा वाचवा म्हणून मदत मागत होते. तर काही लोकांना जबर मार लागल्याचं दिसत होतं. स्थानिकांनी तात्काळ इमारतीचा ढिगारा उचलण्यास सुरुवात केली आणि जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

बचावकार्य युद्धपातळीवर

या इमारतीतील गोदामातच 30 ते 35 लोक दबलेले होते. तर अनेक लोक घरात काम करत होते. त्यामुळे या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 60 ते 70 लोक दबल्याचं सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ढिगारा बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जात आहे. आतापर्यंत किती जखमी झाले? या दुर्घटनेत किती दगावले? याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, अग्निशमन दलाने आपलं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे.

जेवणासाठी थांबलो होतो…

या इमारतीतील गोदामात काम करणाऱ्या कामगाराने इमारत दुर्घटनेची माहिती दिली. आम्ही काही लोक जेवणासाठी गोदामात थांबलो होतो. त्यावेळी अचानक पडझड होत असल्याचा आवाज आला. त्यामुळे आम्ही गोदामाच्या बाहेर पळालो म्हणून आम्ही वाचलो. काही लोक आतच आहेत, ढिगाऱ्याखाली दबले आहेत, असं प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितलं.

जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत.
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न.
भाजप-राष्ट्रवादीचं सरकार दादांची इच्छा होती! तटकरेंचा मोठा खुलासा
भाजप-राष्ट्रवादीचं सरकार दादांची इच्छा होती! तटकरेंचा मोठा खुलासा.