AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकलहरे वीज केंद्रात भीषण अपघात! संवेदनशील भागात कार कुणी नेली? तीन दिवस उलटले प्रशासन अंधारातच…

नाशिक शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एकलहरे येथे वीज निर्मिती केंद्र आहे. याच वीज निर्मिती केंद्रातील प्रतिबंधित विभागाच्या रेल्वे इंजिनने कारला धडक दिल्याची घटना समोर आली आहे.

एकलहरे वीज केंद्रात भीषण अपघात! संवेदनशील भागात कार कुणी नेली? तीन दिवस उलटले प्रशासन अंधारातच...
Image Credit source: Google
| Updated on: Feb 25, 2023 | 1:11 PM
Share

नाशिक : नाशिक शहरालगत असलेल्या एकलहरे वीज निर्मिती केंद्रात रेल्वे ट्रॅकवर भीषण ( Railway Accident ) अपघात झाला आहे. यामध्ये कुठलीही जीवित हांनी झाली नसली तरी ही संपूर्ण घटना गंभीर ( Nashik News ) आहे. संवेदनशील भागात कार कुणी नेली असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. मात्र, हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार चार भिंतीच्या आतमध्येच कसा राहील याची काळजी घेतल्याचे समोर आले आहे. तीन दिवस उलटून गेले तरी वरिष्ठ पातळीवर याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात सुद्धा या अपघाताची अद्यापपर्यन्त नोंद झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होऊ लागली आहे.

नाशिक शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एकलहरे येथे वीज निर्मिती केंद्र आहे. याच वीज निर्मिती केंद्रातील प्रतिबंधित विभागाच्या रेल्वे इंजिनने कारला धडक दिल्याची घटना समोर आली आहे.

यातील विशेष बाब म्हणजे या संपूर्ण प्रतिबंधित विभागात कुठेलही वाहनास परवानगी नाही. याच ठिकाणी अनेक अधिकारी मनमानी करत कार घेऊन जातात. कामाच्या ठिकाणाच हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या ठिकाणाच्या अनेक अधिकारी आपले वाहने लावतात. वीज निर्मितीचा मोठा परिसर असल्याने अनेक जण वाहने थेट कार्यस्थळावर घेऊन जातात. अशाच प्रकारे एका अधिकाऱ्याने ट्रॅकच्या जवळच कार लावलेली होती.

कार काढून निघत असतांनाच अचानक इंजिन आले. त्यामध्ये रेल्वे इंजिनने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला मात्र अंतर कमी असल्याने रेल्वे इंजिनची कारला धडक बसली, त्यात काही अंतरावर इंजिनने कार फरफटत नेली.

या घटनेमुले वीज निर्मिती केंद्रातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार समोर आला आहे. ही घटना घडल्यानंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्थानिक प्रशासनाने तीन दिवस उलटले तरी महानिर्मिती व्यवस्थापनाला याबाबत माहिती न दिल्याची बाब समोर येत आहे. या प्रकरणी तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप कुठलीही नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही.

कोळसा हाताळणी विभागात हा प्रकार घडला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची ही खाजगी कार होती. सुदैवाने या अपघातात वरिष्ठ अधिकारी थोडक्यात बचावले आहे. ट्रॅकवरुन प्रवास करत असतांना ही बाब घडल्याने खळबळ उडाली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात कार घेऊन गेल्याने अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार या निमित्ताने चर्चेत आला आहे. कंपनीतील अनेक कर्मचारी अशाच स्वरूपाचा मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे याची दखल महानिर्मिती प्रशासन घेऊन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.

याशिवाय स्थानिक प्रशासनाने याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसतांना अंतर्गत चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे एकलहरे येथील हा अपघात कोणत्या वळणावर जातो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.