AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं…उदयनराजे यांचा पुन्हा राज्यपालांवर संताप

उदयनराजे यांनी राजकारण्यांनी वेळोवेळी जातीय विषमता निर्माण केली आहे, याशिवाय राज्यपाल इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.

राज्यपालांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं...उदयनराजे यांचा पुन्हा राज्यपालांवर संताप
Image Credit source: Google
| Updated on: Dec 03, 2022 | 12:22 PM
Share

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपाल यांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असंही उदयनराजे यांनी म्हंटले आहे. सातत्याने शिवाजी महाराज यांचा अवमान केला जात असल्याने उदयनराजे यांनी स्पष्टच शब्दात रायगडावरुन राजकारण्यांची कान उघडणी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह त्यांनी भाजपलाही चांगलंच सुनावलं आहे. सर्वच पक्षांनी सोईनुसार महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. यापुढे हे चालणार नाही म्हणत सर्वच राजकारण्यांची लाज काढली आहे. उदयनराजे यांनी सर्वधर्म समभाव हा शिवाजी महाराजांनी अमलात आणला होता, तो फक्त नावालाच राहिल्याने उदयनराजे यांनी त्यावरून हल्लाबोल केला आहे. वेगवेगळी विधाने करून देशाचे तुकडे होतील, देश महासत्ता होणार नाही असेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहे त्यावर बोलत असतांना उदयनराजे यांनी राज्यात जातीय विषमता पसरत असल्याचे देखील म्हंटले आहे.

राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचा वापर सोईनुसार केला असून सोईप्रमाणे इतिहास सांगितला जातो,चित्रपट, लेखक अशा सर्वच ठिकाणी इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.

उदयनराजे यांनी राजकारण्यांनी वेळोवेळी जातीय विषमता निर्माण केली आहे, याशिवाय राज्यपाल इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.

राज्यपाल यांची जो पर्यन्त उचलबांगडी होत नाही तोपर्यन्त माझी मागणी कायम राहील, याशिवाय आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....