AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

'कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही'; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले
| Updated on: Feb 27, 2025 | 9:02 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदे हे नुकतेच महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाऊन आले, यावरून उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे सन्मान आहे, इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधुनो आणि मातांनो, उद्या पेपरला येईल की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. त्यामुळे  आजपासूनच सुरु करा की गर्व से कहो हम हिंदू है आणि अभिमानाने म्हणा मी मराठी आहे. एक ठिणगी पडली आणि उपऱ्याचं आक्रमन बाजूला केलं ती म्हणजे शिवसेना. शिवजयंती झाली, महाशिवरात्री झाली, गुढीपाढवा येईल व्हाटसअप वर तुम्ही जे मेसेज पाठवतात ते पण मराठीतच केले पाहिजेत, कारण  पंतप्रधान म्हटले अमृताशी पैजा जिंके तुम्ही हसताय काय? तुम्ही हसताय त्यामुळे मी पुढचं विसरतोय, असं म्हणत त्यांनी यावेळी हल्लाबोल केला.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.  ‘मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे सन्मान आहे, इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काल परवा साहित्य संमेलन झालं, कसलं संमेलन झालं माहिती नही. विशेष म्हणजे अध्यक्ष यांनी जे विचार मांडले त्यावर चर्चा झाली पाहिजे होती. दिशा दाखवणारे भाषण होत.  यावर देशात चर्चा झाली पाहिजे. माझे आजोबा जे विचार मांडायचे त्यांचे आणि त्यांचे विचार मिळते जुळते आहेत. आपल्या देशाचे यान मंगळावर गेलं म्हणून आपण फटाके फोडतो पण दुसरीकडे माणसाच्या पत्रिकेत आपण मंगळ शोधतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.