AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेच्या पैशांचा चांगला वापर करा, ही तुमच्या हक्काची ओवाळणी आहे – अजित पवार

पुण्यात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेबाबत बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, आतापर्यंतचा हा सर्वात आनंदाचा दिवस आहे. कारण यातून आम्हाला महिलांना मदत करता आली. ही योजना अशीच पुढेही चालू राहणार आहे. त्यामुळे महायुतीला पाठबळ द्या.

लाडकी बहीण योजनेच्या पैशांचा चांगला वापर करा, ही तुमच्या हक्काची ओवाळणी आहे - अजित पवार
| Updated on: Aug 17, 2024 | 3:10 PM
Share

पुण्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ही योजना पुढेही सुरुच राहणार आहे. या योजनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, महिलांसाठी काय करता येईल याचा विचार करत होतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे अनेक वर्ष मंत्री होते. मी दहा वर्ष अर्थमंत्रीपद भूषवलं. लाडकी बहीण योजना आणली. त्यावर टीका करण्यात आली. पण भावांकडे लक्ष नाही असं सांगितलं जातं. अरे शहाण्यांनो कोण म्हणतो भावांकडे लक्ष नाही. आम्ही वीज बील माफ केलं. युवक युवतींना प्रशिक्षणार्थींसाठी वेतन सुरू केलं. हे सरकार सर्व सामान्य जनतेचं सरकार आहे.

सामान्य जनतेचा विचार करणारं सरकार आहे. या योजनेला काही जणांनी विरोध केला. कोर्टात गेले. त्यातही ते टिकलं नाही. आता महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. आता ही योजना तात्पुरती आहे अशी चर्चा सुरू केली. आमचे पाच महिने बाकी आहे. साडे सात हजार रुपये तुम्हाला मिळतील. पुढेही सातत्य टिकवायचं आहे. ते तुमच्या हातात आहे.

महायुतीला पाठबळ द्या – पवार

‘तुम्ही पुन्हा महायुतीला पाठबळ द्या. पुन्हा संधी द्या. पुढच्या पाच वर्षात तुम्हाला ९० हजार देण्याचं काम करणार आहोत. आम्ही कामाचे माणसं आहोत. शब्दाला पक्के आहोत. जे बोलतो ते करतो. वेळ मारून नेणारे नाही. विरोधक अधूनमधून टीका करतात. त्याकडे लक्ष देऊ नका. लोकसभेतही संविधान बदलणार असं खोटंनाटं सांगितलं. आता त्याला बळी पडायचं नाही. हे पैसे भाऊबीज म्हणून दिले आहेत. ते परत घेण्यासाठी दिलेले नाही. हा तुमचा हक्क आहे. अधिकार आहे. त्यामुळे कोणी काय बोलत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांना सरळ सांगा, ए त्या दिवशी तिन्ही भावाने सांगितलं काही काढून घेणार नाही. ही ओवाळणी आहे. ती आम्हालाच राहील.’

आज १ कोटी ८ लाख लोकांचे अर्ज मंजूर झाले. १ कोटी ३ लाख लोकांना पैसे मिळाले. आम्ही मदत करण्यासाठी त्यांना सबल करण्यासाठी या योजना घेतल्या आहेत. त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. खुल्या मैदानात कार्यक्रम घ्यायची मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. पण पावसाने अडचण येऊ शकते म्हणून हा कार्यक्रम इथे घेतला. काळजी घ्या. या पैशाचा विनियोग करा. असं ही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.