AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांची अजित पवारांना साद, व्हिडिओद्वारे क्वारंटाईन सेंटरमधील असुविधा समोर

महाराष्ट्रातून जवळपास 200 तरुण आसाममध्ये लष्करी भरतीसाठी गेली होती. त्यावेळी तिथे त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात हे तरुण निगेटिव्ह आल्याचा त्यांचा दावा आहे. असं असलं तरी त्यांना एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिथे त्यांना चांगलं जेवण, पाणी मिळत नाही. तसंच आसाममध्ये प्रचंड थंडी असताना या तरुणांना साधं पांघरायलाही मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

Video : आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांची अजित पवारांना साद, व्हिडिओद्वारे क्वारंटाईन सेंटरमधील असुविधा समोर
आसाममध्ये अडकून पडलेल्या तरुणांची अजित पवारांना साद
| Edited By: sagar joshi | Updated on: Jan 14, 2022 | 9:44 PM
Share

मुंबई : लष्करी सेवेसाठी (Military Recruitment) आसाममध्ये (Assam) गेलेले महाराष्ट्रातील तरुण आसाममध्ये अडकून पडले आहेत. या तरुणांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे आम्ही कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही आम्हाला क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याचा आरोप या मुलांचा आहे. तसंच या ठिकाणी चांगलं जेवण, पाणी उपलब्ध होत नसल्याचं या मुलांचं म्हणणं आहे. अशावेळी या मुलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना साद घातली आहे.

महाराष्ट्रातून जवळपास 200 तरुण आसाममध्ये लष्करी भरतीसाठी गेली होती. त्यावेळी तिथे त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात हे तरुण निगेटिव्ह आल्याचा त्यांचा दावा आहे. असं असलं तरी त्यांना एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिथे त्यांना चांगलं जेवण, पाणी मिळत नाही. तसंच आसाममध्ये प्रचंड थंडी असताना या तरुणांना साधं पांघरायलाही मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली इथून सोडवणूक करावी अशी मागणी या तरुणांनी केली आहे. या तरुणांनी एक व्हिडीओ काढून तिथल्या परिस्थितीची माहिती देण्याचा प्रयत्नही केला आहे.

3 जानेवारीपासून तरुण आसाममध्ये अडकले!

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आसाममध्ये लष्करी भरती प्रक्रिया 7 आणि 8 जानेवारी दरम्यान होणार होती. त्यासाठी महाराष्ट्रातील दोनशे ते अडीचशे तरुण 3 जानेवारीला आसाम राज्यातील करबी अँगलाँग या जिल्ह्यातील दीपू शहरात दाखल झाले. तिथे त्यांची भरती प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, भरतीपूर्वी या तरुणांची कोरोना रॅपीड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील 60 ते 70 जण कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांसाठी अन्य मुलांनाही कॉरन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आली.

खाण्याची आबाळ, अन्य आजार जडण्याची भीती

कॉरंटाईन सेंटरमध्ये या मुलांना जेवण, पाण्यासह अन्य सुविधा मिळत नाहीत. दीपू हे थंड हवेचे पर्यटनस्थळ आहे. असं असताना या मुलांना पांघरायला चांगल्या शॉल किंवा अन्य काहीही देण्यात आलेलं नाही. अशावेळी कोरोनाचं संकट असताना आता या मुलांना अन्य आजार जडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने याची दखल घेऊन या तरुणांना राज्यात परत आणण्याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी या तरुणांसह त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या : 

Kiran Mane | किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर अखेर निर्मात्यांचं स्पष्टीकरण, राजकीय भूमिका घेतल्यानं हकालपट्टी नाही?

नाशिकमधील रुग्णसंख्येच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर अधिक भर द्यावा, छगन भुजबळांची सूचना

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?