AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महादेव मुंडे हत्याप्रकरणात मोठं ट्विस्ट, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार?

महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणात आता नवं ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे, महादेव मुंडे यांच्या पत्नीनं विष प्राशन केलं होतं, त्यांच्या भेटीसाठी आलेल्या विजयसिंह बांगर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

महादेव मुंडे हत्याप्रकरणात मोठं ट्विस्ट, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार?
| Updated on: Jul 17, 2025 | 3:11 PM
Share

महादेव मुंडे हत्याप्रकरणात आता मोठं ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपाचर सुरू आहेत, दरम्यान दुसरीकडे त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले बांगर? 

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत,  बुधवारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आज पुन्हा एकदा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची रुग्णालयात भेट घेतली. यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आय विटनेसला वाल्मिक कराड आणि प्रशासनातील टोळीने संपवलं आहे, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. तसेच वाल्मिक कराडने जेलमध्ये गेल्यापासून 42 सराईत गुन्हेगारांचा जामीन केला. ते सर्व सध्या बाहेर आहेत आणि वाल्मिक कराड हा जेलमधून बीड जिल्हा चालवत आहे. असा धक्कादायक आरोप विजयसिंह बांगर यांनी केला आहे. पोलीस प्रशासनासमोर हे मोठं चॅलेंज आहे, त्यांनी यामध्ये तळागाळापर्यंत तपास करावा अशीही मागणी विजयसिंह बांगर यांनी केली आहे.

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार? 

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये आहे. दरम्यान त्यानंतर आता महादेव मुंडे हत्याप्रकरणात देखील त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. विजयसिंह बांगर यांनी हे आरोप केले आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आय विटनेसला वाल्मिक कराड आणि प्रशासनातील टोळीने संपवलं आहे, असा आरोप बांगर यांनी केला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.