कोरोना संकटकाळातही शेतकरी थांबला नाही, तो लढला, उलट त्याने सुशिक्षितांना लढणं शिकवलं : सुनील केदार

शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करुन सुशिक्षितांना कोरोनाविरोधाच्या लढाईत लढणं शिकवलं, असं वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले (Wardha Guardian Minister Sunil Kedar appreciate work of farmers).

कोरोना संकटकाळातही शेतकरी थांबला नाही, तो लढला, उलट त्याने सुशिक्षितांना लढणं शिकवलं : सुनील केदार
Follow us
| Updated on: Aug 15, 2020 | 3:41 PM

वर्धा : “कोरोना संकटकाळात अनेकांचा कामाचा वेग मंदावला. पण शेतकऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. शेतकरी आणि शेतमजूर यांचं काम सुरुच आहे. या संकट काळात शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करुन सुशिक्षितांना कोरोनाविरोधाच्या लढाईत लढणं शिकवलं”, असं मत वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं (Wardha Guardian Minister Sunil Kedar appreciate work of farmers).

देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. वर्ध्यातही जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कमी लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रमात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्याचं कौतुक केलं.

“वर्धा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सगळी कामे बंद होती. पण शेतकरी आणि शेतमजूर शेतात राबत होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कठीण काळातही पेरणीचं काम केलं”, असं सुनील केदार म्हणाले. यावेळी सुनील केदार यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांचे आभारही मानले.

दरम्यान, या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्याहस्ते कोरोना संकटात झटणारे डॉक्टर, स्वयंसेवीसंस्था आणि पोलिसांना सन्मानित करण्यात आले (Wardha Guardian Minister Sunil Kedar appreciate work of farmers).

वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकसह अधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी होती. यंदा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची 150 वी जयंती साजरी होत आहे. वर्धेकरांसाठी ही एक अभिमानासह भाग्याची गोष्ट आहे. गांधीजींचे हे जयंती वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करायचं, असं मतही यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : आपके राज्य में बिना आपके परमिशन आ गये, राज्यपालांचा अजितदादांना मिश्कील टोला

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.