AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha tourism | वर्ध्यात वाढत्या तापमानाचा पर्यटनावर परिणाम; सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली

वर्ध्याचही तापमान 45.5 अशांवर सरकलंय. वाढत्या तापमानामुळं बहुतांश जण घराबाहेर पडणं टाळताहेत. वाढत्या तापमानामुळं उष्माघाताचाही धोका आहे. सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

Wardha tourism | वर्ध्यात वाढत्या तापमानाचा पर्यटनावर परिणाम; सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली
वाढत्या तापमानामुळं सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांचीही संख्या घटल्याच दिसतंय.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 30, 2022 | 2:35 PM
Share

वर्धा : मागील काही दिवसांपासून तापमान चांगलंच वाढलंय. उन्हाच्या तप्त झळांनी सगळेच बेजार आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम पर्यटनावरही (Tourism) होतोय. वाढत्या तापमानामुळं सेवाग्राम आश्रमातील (Sevagram Ashram) पर्यटकांचीही संख्या घटल्याच दिसतंय. मागील तीन दिवसांपासून वर्धेच तापमान हे 45 अंशाच्या घरात आहे. यामुळे सगळीकडे लाहीलाही होताना दिसत आहे. पूर्वी मेअखेरीस असं उष्णतामान असायचं. आता एप्रिल महिन्यातच तापमान वाढत आहे. उन्हात बाहेर पडू नये, अस आवाहन सरकारनही केलंय. काळजी घेण्याची गरज असल्याचही सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन प्रभू (T. R. N Prabhu) म्हणालेत.

मोजकेचं पर्यटक देतात भेट

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तापमान वाढलंय. काही जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पारा 45 अंशांच्या पार गेलाय. वर्ध्याचही तापमान 45.5 अशांवर सरकलंय. वाढत्या तापमानामुळं बहुतांश जण घराबाहेर पडणं टाळताहेत. वाढत्या तापमानामुळं उष्माघाताचाही धोका आहे. सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. मोजकेच पर्यटक, विद्यार्थी किंवा इतर राज्यांतील व्यक्ती आश्रमाला भेट देतायत. अशी माहिती सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन प्रभू यांनी दिली.

दोन मेपर्यंत उष्णतेची लाट

भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्या संदेशानुसार 29 एप्रिल ते सोमवार 2 मे या कालावधीत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी या कालावधीत शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे. शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. बाहेर जाताना कानाला रुमाल बांधावा. अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश अकोला जिल्ह्यातील सर्व तसेच आरोग्य यंत्रणांनी दक्ष रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.