AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha tourism | वर्ध्यात वाढत्या तापमानाचा पर्यटनावर परिणाम; सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली

वर्ध्याचही तापमान 45.5 अशांवर सरकलंय. वाढत्या तापमानामुळं बहुतांश जण घराबाहेर पडणं टाळताहेत. वाढत्या तापमानामुळं उष्माघाताचाही धोका आहे. सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

Wardha tourism | वर्ध्यात वाढत्या तापमानाचा पर्यटनावर परिणाम; सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली
वाढत्या तापमानामुळं सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांचीही संख्या घटल्याच दिसतंय.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 30, 2022 | 2:35 PM
Share

वर्धा : मागील काही दिवसांपासून तापमान चांगलंच वाढलंय. उन्हाच्या तप्त झळांनी सगळेच बेजार आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम पर्यटनावरही (Tourism) होतोय. वाढत्या तापमानामुळं सेवाग्राम आश्रमातील (Sevagram Ashram) पर्यटकांचीही संख्या घटल्याच दिसतंय. मागील तीन दिवसांपासून वर्धेच तापमान हे 45 अंशाच्या घरात आहे. यामुळे सगळीकडे लाहीलाही होताना दिसत आहे. पूर्वी मेअखेरीस असं उष्णतामान असायचं. आता एप्रिल महिन्यातच तापमान वाढत आहे. उन्हात बाहेर पडू नये, अस आवाहन सरकारनही केलंय. काळजी घेण्याची गरज असल्याचही सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन प्रभू (T. R. N Prabhu) म्हणालेत.

मोजकेचं पर्यटक देतात भेट

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तापमान वाढलंय. काही जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पारा 45 अंशांच्या पार गेलाय. वर्ध्याचही तापमान 45.5 अशांवर सरकलंय. वाढत्या तापमानामुळं बहुतांश जण घराबाहेर पडणं टाळताहेत. वाढत्या तापमानामुळं उष्माघाताचाही धोका आहे. सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. मोजकेच पर्यटक, विद्यार्थी किंवा इतर राज्यांतील व्यक्ती आश्रमाला भेट देतायत. अशी माहिती सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन प्रभू यांनी दिली.

दोन मेपर्यंत उष्णतेची लाट

भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्या संदेशानुसार 29 एप्रिल ते सोमवार 2 मे या कालावधीत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी या कालावधीत शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे. शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. बाहेर जाताना कानाला रुमाल बांधावा. अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश अकोला जिल्ह्यातील सर्व तसेच आरोग्य यंत्रणांनी दक्ष रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.