AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Market | बाजार समिती कार्यालयात भाजीविक्रेत्यांचा ठिय्या, बाजार बजाज चौकात नको; वर्ध्यात शेतकरीही आक्रमक

पावसाच्या पाण्याने भाजीपाला खराब होतो. त्यामुळे बाजार समितीतच भाजीची विक्री करु द्या, या मागणीसाठी बाळकृष्ण माऊस्कर यांच्या नेतृत्वात भाजीविक्रेत्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

Wardha Market | बाजार समिती कार्यालयात भाजीविक्रेत्यांचा ठिय्या, बाजार बजाज चौकात नको; वर्ध्यात शेतकरीही आक्रमक
बाजार समिती कार्यालयात भाजीविक्रेत्यांचा ठिय्या
| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 7:11 PM
Share

वर्धा : कोरोना काळात बजाज चौकात असणारा भाजी बाजार बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, आता पुन्हा सदर बाजार बजाज चौकात ( Bajaj Chowk) स्थलांतरित करण्याचा आदेश देण्यात आला. बजाज चौकात भाजी बाजार गेल्यास शेतकऱ्यांना माल वाहतुकीस अडचण निर्माण होईल. भाजीपाला शेतकरी दररोज भाजी घेऊन येतो. मात्र, बजाज चौकातील बाजारात त्यांची कोंडी होते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) परिसरातच आम्हाला भाजी विकू द्या, अशी मागणी करण्यात आली. पुढे पावसाळ्याचे दिवस असल्याने जुन्या भाजी बाजारात चिखल साचतो. वाहने फसतात. वाहतूक पोलिसांचा त्रास होतो. चालानमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पार्किंगची व्यवस्था नाही. पाण्याची व्यवस्था नाही. वाहतूक कोंडी (Traffic Congestion) होत असल्याने हमालही मिळत नाही. त्यामुळे बाजार स्थलांतराचा आदेश रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

स्थलांतराचा आदेश रद्द करण्याची मागणी

बजाज चौकात असलेल्या जुन्या भाजी बाजारात शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. माल वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होते. पुढे पावसाळा असून पावसाच्या पाण्याने भाजीपाला खराब होतो. त्यामुळे बाजार समितीतच भाजीची विक्री करु द्या, या मागणीसाठी बाळकृष्ण माऊस्कर यांच्या नेतृत्वात भाजीविक्रेत्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. भाजी बाजार स्थलांतराचा आदेश रद्द करण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

बाजार समिती प्रशासकाने काढले पत्र

शेतकरी आणि भाजीविक्रेत्यांच्या आंदोलनाची दखल घेत बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांची चर्चा केली. त्यांची अडचण लक्षात घेता भाजी बाजाराचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तोपर्यंत सध्या भरत असलेला भाजीबाजार पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात आहे. त्याच ठिकाणी निश्चित केलेल्या जागेत सुरु राहील. मात्र, यामुळे बाजार समितीच्या कामकाजात अडचण निर्माण होणार नाही. याची दक्षता घेण्याचे पत्र बाजार समितीच्या प्रशासकांनी काढले आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.