AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : 8 दिवस राज्यात मुसळधार पाऊस; नदी-नाले एक होणार, पंजाबराव डख यांनी दिली गुडन्यूज

राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे, मात्र अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा एकही थेंब पडलेला नाहीये, शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. परंतु आता एक गुड न्यूज आहे, राज्यात लवकरच चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

Monsoon Update : 8 दिवस राज्यात मुसळधार पाऊस; नदी-नाले एक होणार, पंजाबराव डख यांनी दिली गुडन्यूज
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवा मान्सून अंदाज Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 18, 2026 | 10:20 PM
Share

जून महिना संपत आला तरी देखील अजूनही महाराष्ट्रात पाऊस पडलेला नाहीये. राज्यात 15 दिवसांपूर्वीच मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता, मात्र त्यानंतर अचानक मान्सूनच्या वाटचालीला ब्रेक लागला. राज्यातील काही जिल्ह्यांमध्येच पाऊस झाला, तर अजूनही महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे कोरडेच आहेत. पाऊसच झालेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या वाटेकडे लागले आहेत, मात्र आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे भारतीय हवामान विभागानं (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 20 तारखेपासून राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा देखील नवा अंदाज समोर आला आहे.

काय आहे नवा अंदाज 

पंजाबराव डख यांनी देखील असाच अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांच्या नव्या अंदाजानुसार येत्या 21 जूनपासून ते 30 जून पर्यंत राज्यात चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र एकाचवेळी होणार नाही, मात्र तो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये हजेरी लावेल असं डख यांनी म्हटलं आहे. पावसाला साधारणपणे विदर्भातून सुरू होईल आणि त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असं संपूर्ण राज्य मान्सून व्यापून टाकेल. 21 जून ते 30 जून हे आठ दिवस राज्यात जोरदार पाऊस होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, असं डख यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना काय सल्ला? 

दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, आधी शेतातील ओल तपासावी, जर ओल चांगली नसेल तर पेरणी करू नये, असं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे. जर जमिनीत एक किंवा दोन बोट एवढीच ओल असेल तर पेरणी करू नये, मात्र एक इतिच्या पुढे ओल असेल तर पेरणी करायला हरकत नाही, असा सल्ला त्यांनी दिला आहे. पुढील आठ दिवस राज्यात चांगला पाऊस होईल, तसेच यावर्षी दुष्काळ देखील पडणार नाही, राज्यात परतीचा पाऊस जोरदार होईल, असंही यावेळी पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी