AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : येत्या काही तासांत वातावरणात मोठा बदल, या जिल्ह्यात पावसाचं संकट..

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या कमाल तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा अनुभवायाला मिळत आहेत , त्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather Update : येत्या काही तासांत वातावरणात मोठा बदल, या जिल्ह्यात पावसाचं संकट..
महाराष्ट्र हवामान
| Updated on: Feb 13, 2026 | 8:26 AM
Share

फेब्रुवारी महिना सुरू झाला नाही तोच उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. आत्ताच ही स्थिती तर ऐन उन्हाळ्यात काय असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. सकाळी थोडा गारवा असला तरी सूर्य डोक्यावर आल्यावर तापमानाचा पारा चांगलाच चढतो. मात्र फेब्रुवारीचे 12- 13 दिवस कोरडे गेल्यावर आता राज्याच्या वातावरणात वेगान बदल दिसून येत आहेत. उत्तर भारतात सतत येणाऱ्या वेस्टर्न डिस्टरबेंसमुळे देशाचं हवामान जलद बदलत असून त्याचेच परिणाम महाराष्ट्रातही उमटताना दिसू शकतात. राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडं वातावरण असलं तरी येत्या काही तासांत राज्यात पावसाचे आगमन होऊ शकते. येत्या 17-18 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील काही जिव्हात पाऊस कोसळू शकतो, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

राज्यात कुठे पडणार पाऊस ?

हवामाना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याचाच परिणा येत्या काही दिवसांंत दिसून येऊ शकतो आणि 17-18 तारखेला पावसाच्या सरी कोसळू शकतात. महाराष्ट्रातील पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. मोठा, मुसळधार पाऊस पडणार नसला तरी ऐन फेब्रुवारीत पर्जन्य आल्यास त्याचा पिकांवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. तसेच वाढत्या तापमानावरही त्याचा असर पडू शकतो.

दरम्यान उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हे वारे थड असून गेल्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेलस गारव्यातही वाढ झाल्याची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देशात पारा काहीसा घसरलेला दिसला. आखणी काही दिवस हीच स्थिती कायम राहू शकते.

नाशिकमध्ये तापमान 32 अंशांपार

गेल्या 4 दिवसांपासून नाशिकमध्ये तापमान 32 अंशांपार गेलं आहे. शहर व परिसरात मागील चार दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. वातावरणात जाणवणारी थंडी, गारवा गायब झाला असून उन्हाळ्याची चाहूल लागण्यात सुरुवात आहे. उष्यामध्ये वाढ झाली असून रात्रीही काही प्रमाणात उकाडा जाणवतोय. कमाल व किमान तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना रात्री जाणवणारा गारठासुद्धा आता कमी झाल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.