AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोर्‍हे, कायंदे, बजोरिया यांच्या निलंबनाचे काय? मुंबई महापालिकेची निवडणूक कुणामुळे रखडली? अनिल परब यांची जोरदार बॅटिंग

7 मार्च 2022 रोजी पालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारनेच केलेल्या सर्व्हेमध्ये निवडणुकीत यश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने...

गोर्‍हे, कायंदे, बजोरिया यांच्या निलंबनाचे काय? मुंबई महापालिकेची निवडणूक कुणामुळे रखडली? अनिल परब यांची जोरदार बॅटिंग
ANIL PARAB
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Aug 03, 2023 | 10:17 PM
Share

मुंबई । 3 ऑगस्ट 2023 : मुंबई महापालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली. पण, न्यायालयाचा मुद्दा पुढे करून निवडणूक घेण्यास सरकार टाळाटाळ करत आहे असा आरोप करतानाच उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्यासह मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांच्या अपात्रतेच्या नोटीसचे काय झाले? असा सवाल शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला. तसेच, सभागृहाला खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावाची सूचना मांडत विधान परिषदेत जोरदार बॅटिंग केली.

अंतिम आठ्वड्यावरील प्रस्तावावर बोलताना अनिल परब यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) न्यायालयात गेल्यामुळे महापालिका निवडणूक रखडल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या आरोपांचे खंडन करताना शिंदे आणि भाजप यांनी शिवसेनेची धास्ती घेतली आहे त्यामुळेच सरकार निवडणूक घेण्याच हिंमत करत नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

लोकसंख्या वाढीमुळे प्रशासकीय सुविधेसाठी महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड संख्या 227 वरून 236 करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिंदे भाजप सरकारने हा निर्णय बदलला. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुप्रीम कोर्टात गेली.

परंतु, सुप्रीम कोर्टाने 227 वॉर्डनुसार निवडणुका घेण्यास कोणतीही बंदी घातलेली नाही. तसेच शिवसेनेनेही निवडणुका घेण्यास विरोधही केलेला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिवसेनेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या हा विरोधकांचा आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले.

7 मार्च 2022 रोजी पालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारनेच केलेल्या सर्व्हेमध्ये निवडणुकीत यश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ही निवडणूक टाळली जात आहे का, असा सवाल त्यांनी केला.

सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती ही राज्यातील इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांबाबत आहे असे स्पष्ट करून या प्रकरणातही सरकार वारंवार वेळ वाढवून मागत असल्यानेच या निवडणुका रखडल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या अपात्रेतचा निर्णय कधी होणार?

उपसभापती नीलम गोर्‍हे, मनिषा कायंदे, विप्लव बजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण, त्यांच्याविरोधात दिलेल्या अपात्रतेच्या नोटीशीचे काय झाले? सरकारने जे आश्वासन दिले त्यानुसार समितीची नियुक्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पालिका आयुक्त, मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात हक्कभंग

मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा विभागाकडून बसवण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन्स मशीन्स निविदा प्रक्रियेतील घोटाळा गेल्या अधिवेशनात मांडण्यात आला होता. त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात परब यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...