AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातचा विजय लोकशाही पद्धतीने नाही, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला दावा काय ?

गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपला ही सत्ता मिळाली आहे. त्यात कॉँग्रेसची पिछेहाट झाली आहे, आप च्या मतांचा टक्काही गुजरातमध्ये वाढला आहे.

गुजरातचा विजय लोकशाही पद्धतीने नाही, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला दावा काय ?
Image Credit source: Google
| Updated on: Dec 08, 2022 | 1:03 PM
Share

मुंबई : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यावर भाजपकडून देशभर विजय साजरा केला अजत असतांना कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र या निकालावर भाजपला चिमटे काढले आहे. लोकशाहीची हत्या करून मिळवलेला हा विजय असून तपास यंत्रणांचा गैरवापर करून विजय मिळवला आहे. या निकालावरुण आम्ही त्यांचे स्वागत करतो अशा शुभेच्छा देत पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. गुजरातमध्ये आपचा काही प्रमाणात कॉँग्रेसला फटका बसला असल्याची चर्चा असतांना नाना पटोले यांनी मात्र त्यावर बोलणं टाळलं आहे. केंद्रात असलेली सत्ता आणि तपास यंत्रणेच्या जोरावर भाजप गैरवापर करून सत्ता मिळवायची असे भाजपचे धोरण असल्याचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कोणीही भाजपचे नेते गेले तरी काहीही फरक पडणार नाही, तिथे कोंग्रेसचीच सत्ता येईल असा दावाही नाना पटोले यांनी टीव्ही 9 शी बोलतांना केला आहे.

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला जो कौल दिला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो, परंतु भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मिळवलेली सत्ता आहे असे नाना पटोले यांनी आरोप केला आहे.

गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपला ही सत्ता मिळाली आहे. त्यात कॉँग्रेसची पिछेहाट झाली आहे, आपच्या मतांचा टक्काही गुजरातमध्ये वाढला आहे.

त्यात हिमाचल प्रदेश मध्ये आपला फारसे यश आले नसले तरी कॉँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यात भाजपला तिथे सत्ता गमवावी लागली आहे.

गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी मोदींचा करिश्मा तिथे कायम असल्याचे दिसून येत आहे, याशिवाय कॉँग्रेसची निवडणूक येणाऱ्या आमदारांची संख्या कमी झाल्याने कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

ही सर्व परिस्थिती असतांना कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती त्याचाही फारसा परिणाम दिसला नाही, उलट भाजपचे यश अधिक गडद झाल्याचे दिसून आले आहे.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.