AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेत कोणते तरुण पात्र ठरणार? वाचा A टू Z माहिती

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे. सरकार राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये बेरोजगार तरुणांना अप्रेंटिसशिप किंवा प्रशिक्षण मिळवून देईल. तसेच या तरुणांच्या बँक खात्यात दर महिन्याला सरकारकडून 6 हजार ते 10 रुपये देखील जमा होणार आहेत.

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेत कोणते तरुण पात्र ठरणार? वाचा A टू Z माहिती
लाडका भाऊ योजनेत कोणते तरुण पात्र ठरणार?
| Updated on: Jul 17, 2024 | 8:54 PM
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. पण या योजनेवरुन विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात होती. फक्त लाडकी बहीण योजनाच का? महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारने लाडका भाऊ योजना का आणली नाही? सरकार असा भेदभाव का करत आहे? असे अनेक सवाल विरोधकांकडून केले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रश्नांना अखेर उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. पण या योजनेसाठी सरसकट सगळेच तरुण पात्र राहणार नाहीत. सरकारने पात्र तरुणांसाठी काही अटी ठेवल्या आहेत.

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे. सरकार राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये बेरोजगार तरुणांना अप्रेंटिसशिप किंवा प्रशिक्षण मिळवून देईल. यासाठी तरुणांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देईल. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला 6 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतचं प्रशिक्षण वेतनही देणार आहे. पण त्यासाठी तीन वर्गीकरण करण्यात आली आहेत.

राज्य सरकार 12 उत्तीर्ण बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण घेत असतील तर त्यांना महिन्याला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. आय.टी.आय किंवा डिप्लोमा केलेल्या बेरोजदार तरुणांना दर महिन्याला 8 हजार रुपये मदत देणार आहे. तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना महिन्याला 10 हजार रुपयांची मदत देणार आहे. याशिवाय सहा महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर संबंधित कंपनी किंवा कारखान्यातून प्रमाणपत्र देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नोकरी मिळवताना होणार आहे.

यो योजनेसाठी नेमके पात्र तरुण कोण आहेत?

  • या योजनेसाठी सर्वात पहिली अट ही संबंधित तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
  • दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तरुणाचं वय हे 18 ते 35 वयोगटाच्या आत असावं.
  • तरुणाचं शिक्षण हे 12 वी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असावं.
  • संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल
  • तरुणाचं बँक खातं आधारकार्डशी जोडलं गेलेलं असायला हवं

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • आधारकार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • जन्मदाखला किंवा वयाचा दाखला
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खाते पासबुक

लाडका भाऊ योजनेसाठी कुठे अर्ज करणार?

  • तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
  • तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
  • तिथे होम पेज उघडल्यानंतर New User Registration या बटनावर क्लिक करावं लागेल.
  • तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज ओपन होईल.
  • या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वकपणे भरावी लागेल.
  • यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमीट बटनवर क्लिक करावं लागेल.
  • अशा माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.