AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडताना का होतेय काँग्रेसची दमछाक? कुणी दिले 30 आमदारांचे पत्र?

विरोधी पक्ष नेतेपदावरून सभागृहात खडाजंगी झाली. तर, दुसरीकडे चर्चा सुरु झाली ती या पदासाठी काँग्रेसची दमछाक होत असल्याची. काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपने फोडले. आपल्या पक्षात घेतले. त्यानंतर विरोधी पक्षनेते झालेले एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही भाजपने आपल्यासोबत घेतले.

विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडताना का होतेय काँग्रेसची दमछाक? कुणी दिले 30 आमदारांचे पत्र?
DEVENDRA FADNAVIS AND SONIYA GANDHIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 29, 2023 | 3:19 PM
Share

मुंबई । 29 जुलै 2023 : विधानसभेत विरोधी पक्षनेते अभावी दुसऱ्या आठवड्याचेही कामकाज पूर्ण झाले. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार सत्तेत सामील झाल्याने विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. विधानसभेत महाविकास आघाडीमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून आता काँग्रेस पुढे आल्याने साहजिकच या पदावर काँग्रेसने आपला दावा सांगितला. 2 जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, 28 दिवस उलटूनही काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदासाठी योग्य उमेदवार सापडलेला नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असे नेते काँग्रेसमध्ये आहेत. तरीही विरोधी पक्षनेते पदासाठी कोण उमेदवार द्यावा यासाठी काँगेसची दमछाक होत आहे. काय आहे यामागचे कारण?

विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावरून भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला डिवचले. आजपर्यत यांना विरोधी पक्षनेता का घोषित करता आला नाही हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे,. जनतेची इच्छा आहे. विरोधी पक्षनेते नसताना सरकारच्या निर्णयाला विरोध करणे ही धोक्याची घंटा आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

त्यावर पलटवार करताना काँग्रेसचे नाना पटोले यांनी सरकारला अडचणीत आणणारा मुद्दा उपस्थित केला. आम्ही विरोधी पक्षनेता का निवडला नाही? हा जर तुमचा मुद्दा असेल तर सहा जिल्ह्यात एकच मंत्री पालकमंत्री आहे. काय चाललंय या राज्यात? अवकाळी पावसात आमचा पालकमंत्री त्या जिल्ह्यात पोहोचू शकला नाही. हा आमचाही मुद्दा आहे. आम्हालाही बोलता येते, असे पटोले म्हणाले.

शिवसेना, राष्ट्रवादी या राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांना फोडल्यानंतर भाजपची नजर आता काँग्रेसवर आहे. काँग्रेसचे किमान 30 आमदार फुटीरतेच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. याआधी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण हे कट्टर काँग्रेस समर्थक असले तरी त्यांना पक्षातूनच विरोध आहे.

दुसरीकडे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे प्रबळ उमेदवार मंत्री राहिल्याने त्यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा मागे लावून पुन्हा विरोधी पक्षनेते फोडण्याची खेळी भाजप खेळू शकते. त्यातच विरोधी पक्षनेते पदावर आमदार संग्राम थोपटे यांनी दावा सांगितला असून त्यांनी काँग्रेस हायकमांडला थेट 30 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र पाठविले आहे.

काँग्रेसचे विधासनभेत संख्याबळ 43 इतके आहे. त्यात संग्राम थोपटे यांना 30 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. ही संख्या एक तृतीयांश इतकी होत असल्याने काँग्रेसने पक्ष फुटीचा धसका घेतला आहे. त्यामुळेच विरोधी पक्ष नेतेपदाचा तिढा निर्माण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.