UPSC परीक्षेत मराठी मुले मागे का? खरंच कठीण असते परीक्षा? महाराष्ट्राचा नंबर IAS,IPS मध्ये युपी-बिहारनंतर का ?
युपीएससीची परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण परीक्षा समजली जाते. या परीक्षेत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या तुलनेत महाराष्ट्रातील मुले मागे असतात. युपीएससी परीक्षेत यंदा मराठी टक्का कमी झाला आहे. युपीएससीमधील मराठी टक्का असाच घसरला तर मराठी आयएएस अधिकारी दुर्मिळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठी टक्का का घसरतोय याचा घेतलेला आढावा

देशातील सर्वात अवघड आणि उमेदवारांचा कस पाहणाऱ्या युपीएससीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( युपीएससी ) घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालात यंदा मराठी टक्का घसरला आहे. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव याने पहिला क्रमांक तर अनिमेष प्रधान याने दुसरा आणि अनन्या रेड्डी हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी यश मिळविले असले पहिल्या दहामध्ये एकही महाराष्ट्राचा विद्यार्थी नाही तर तरी पहिल्या शंभर विद्यार्थ्यात देखील मराठी उमेदवारांची संख्या थोडी कमी झाली आहे. दरवर्षी पहिल्या शंभर उमेदवारात महाराष्ट्रातील 10 ते 12 उमेदवारांचा समावेश असतो. यंदा केवळ पाच ते सहा उमेदवारांनाचा पहिल्या शंभरांत स्थान मिळविता आले आहे. यंदाच्या युपीएससी परीक्षांत मराठी मुलांचा टक्का का घसरला याचा घेतलेला धांडोळा…. ...
