Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे शिक्षण मंत्री होऊ शकतात का? सुनील तटकरेंनी शक्यता नाकारली नाही, कसं शक्य आहे ते सांगितलं
Sunil Tatkare : "दोन बाबी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीमध्ये गेले. पक्ष नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वाशी त्यांची भेट झाली असेल. नेमकी भेट कशामुळे झाली मला माहिती नाही"

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळालं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एक नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शिक्षण खात्याचा भार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवला आहे. पण त्याजागी श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते का? यावर सुनील तटकरे बोलले आहेत. श्रीकांत शिंदे शिक्षण मंत्री होणार का?. “तो निर्णय नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा असतो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला उज्वल असे यश महाराष्ट्रमध्ये मिळाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार विलीन झाले. शिंदे साहेबांनी ताकद लोकशाहीच्या माध्यमातून सिद्ध केली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतो, त्या संदर्भात निर्णय एनडीएचं नेतृत्व घेत असतं. नेमक्या किती जागा शिवसेनेला द्यायच्या, कोणत्या पक्षाला द्यायचं हा अधिकार त्यांचा आहे. तो दिल्यानंतर कोणाला मंत्री करावं, हा अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे” असं तटकरे म्हणाले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आज ठाकरे बंधुंनी विजयी सभा घेतली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शेवटी कोणी कोणत्या विषयावरती काय भावना व्यक्त कराव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार सर्वांना अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवस विद्यार्थी संवाद केला. चर्चा करण्यासाठी निरोप पाठवले. नवीन पिढीमध्ये असलेल्या भावना याचा सन्मान मोदी करत आहेत. लोकशाहीच्या पद्धतीने निर्णय झाला आहे” असं सुनील तटकरे म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर तटकरे म्हणाले की, “दोन बाबी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीमध्ये गेले. पक्ष नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वाशी त्यांची भेट झाली असेल. नेमकी भेट कशामुळे झाली मला माहिती नाही”
दोन्ही राष्ट्रवादी विलीनी करण्याची चर्चा कुठेही नाही
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर सुद्धा ते बोलले. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत यापूर्वीच सुप्रियाताई ,श्रीकांत शिंदे यांनी मत व्यक्त केले आहे. परंतु राजकारणामध्ये आपण म्हणतात त्याप्रमाणे आज तरी दोन्ही राष्ट्रवादी विलीनी करण्याची चर्चा कुठेही नाही. योग्यवेळी तशा प्रकारची चर्चा सुरू झाली तर, त्यावेळेचा विचार त्यावेळेस होईल. मात्र आता विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद आहे” असं तटकरे म्हणाले.