AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याची गरज होती का?, उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल

हप्ते घेणाऱ्याला मी मंत्री केलं नव्हतं. आपलं काही अजून भाजप झालं नाही, असा खरपूस समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याची गरज होती का?, उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल
| Updated on: Jul 09, 2023 | 6:21 PM
Share

यवतमाळ : उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी पोहरादेवी येथे भेट दिली. त्यानंतर संजय राठोड यांच्या मतदारसंघात दिग्रस येथे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, आंधळ्या निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असतील. नसतील उघडले तर त्यांना मिटलेले ठेवावे कारण या ठिकाणी असलेल्यांचे डोळे उघडले आहेत.समोर बसलेले लोकं हे जगदंबेचे रूप आहे. शंकराचे तिसरे नेत्र आहे.

महाराष्ट्रासाठी मागितले मागणे

जगदंबेला आशीर्वाद मागितला पाहिजे. मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, असा आशीर्वाद मागितला नाही. या राज्यात गद्दार आणि लाचारांचं सरकार चाललं आहे. राजकारण खालच्या पातळीवर जात आहे. महाराष्ट्र हा राकट, कणखर होऊ दे, असे मागणे मागितले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

जगदंबेला साकडं घातलं की, पाऊसपाणी व्यवस्थित येऊ दे. अशी प्रार्थना जगदंबेला केली. हप्ते घेणाऱ्याला मी मंत्री केलं नव्हतं. आपलं काही अजून भाजप झालं नाही, असा खरपूस समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.

ही लाचारी नाही का?

भारतीय जनता पक्ष हा बाजार बुडव्यांचा पक्ष झाला आहे. आधी भाजपमध्ये चांगली लोकं होती. पण, आता भ्रष्टाचाराने माखलेले लोकं भाजपमध्ये आले आहेत. दुसऱ्या पक्षातले तुमच्याकडे येतात. तुम्ही सतरंज्या हातरण्याचं काम करता. ही लाचारी नाही का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

छगन भुजबळ शिवसेनेत होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. इथपर्यंत ठिक आहे. पण, आता पक्ष संपवण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवली जाते. आम्ही तुमच्यावर बोलतो. तुम्ही आमच्यावर बोला. शेवटी जे ठरवायचं ते जनता जनार्दन ठरवत असते. याला लोकशाही म्हणतात.

मत कुणालाही द्या, सरकार माझंच येणार. आधी मतपेटीतून सरकार जन्माला येत होतं. आता खोक्यातून सरकार जन्माला येत आहे. आधी आमचे आमदार फोडले. अपक्षही नेले. पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची गरज होती का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत.
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न.