AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायत झाले तरीही पाण्यासाठी बोंबाबोंब, संतप्त महिलांनी नप कार्यालयाचे कुलूप का फोडले?

दिवसेंदिवस ढाणकी शहरातील पाणी समस्या उग्ररूप धारण करत आहे. आज शहरातील महिलांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त महिलांनी थेट नगरपंचायत कार्यालयाचे कुलूप हातोड्याने फोडत नगरपंचायतमध्ये राडा केला.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायत झाले तरीही पाण्यासाठी बोंबाबोंब, संतप्त महिलांनी नप कार्यालयाचे कुलूप का फोडले?
| Updated on: Jun 18, 2023 | 3:34 PM
Share

विवेक गावंडे, प्रतिनिधी, यवतमाळ : उन्हाळा असल्याने पाण्याची जास्त गरज आहे. परंतु, ढाणकीत पाणीसमस्येने उग्र रूप धारण केले. महिलांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते. नगरपंचायतीमध्ये गेल्यानंतर तिथं विभाग प्रमुख कधी प्रभारावर असल्याचे सांगतात. तर बहुधा उपस्थित राहत नाही. तक्रार कुणाकडं करावी, असा प्रश्न निर्माण होत होता. शिवाय तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे संतप्त महिलांना आज नगरपंचायत कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकले. दिवसेंदिवस ढाणकी शहरातील पाणी समस्या उग्ररूप धारण करत आहे. आज शहरातील महिलांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त महिलांनी थेट नगरपंचायत कार्यालयाचे कुलूप हातोड्याने फोडत नगरपंचायतमध्ये राडा केला. संपूर्ण उन्हाळाभर शहराला पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत होता.

या भागातील महिला संतप्त

आता उन्हाळा संपून पावसाची प्रतीक्षा असतानाही 20 दिवस पाणीपुरवठा होत नाही. यावर नगरपंचायत प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही. ही समस्या सांगण्यासाठी कार्यालयात गेल्यास विभाग प्रमुख हजर राहत नाहीत, असा महिलांचा आरोप आहे. प्रभाग क्रमांक 10, 11, 12, 16 मधील महिला संतप्त झाल्या.

यांनी ऐकून घेतल्या समस्या

आपल्या लहान मुलांसह त्या नगरपंचायत कार्यालयावर धडकल्या. संतप्त महिलांचा राग शांत करण्यासाठी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक शेख खाजा शेख कुरेशी हे महिलांना सामोरे गेले. त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून यावर निश्चितच नगरपंचायत प्रशासनाकडून उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे संतप्त महिलांचा राग काही वेळ निवळला.

विभाग प्रमुखांनी नेहमी गैरहजेरी

ढाणकी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. मात्र समस्या जैसे थेच आहेत. आजही शहराला पूर्णपणे पाणी उपलब्ध होत नाही. कार्यालयातील वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख हे प्रभागावर आहेत. शहरात कोणतीही विकास काम सुरळीत होत नाही. विशेष म्हणजे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला आरोग्य आणि पाणी या विभागाच्या प्रमुख कार्यालयात सतत गैरहजर राहतात. त्यामुळे या समस्यांनी उग्ररूप धारण केले आहे.

समस्या मांडण्यासाठी नागरिक कार्यालयात आल्यास केव्हाच विभाग प्रमुख हजर राहत नाहीत. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तातडीने शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, अशी संतप्त महिलांची मागणी होती.

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.