AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown : कांजूरमार्गवरुन अकोल्याकडे मजूर रवाना, 600 किमी पायपीट करण्याची तयारी

लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीने मुंबईत मोलमजुरी करणाऱ्या मजूर आणि कामगारांनी नाईलाजास्तव आपल्या गावाकडची वाट धरली आहे.

Lockdown : कांजूरमार्गवरुन अकोल्याकडे  मजूर रवाना, 600 किमी पायपीट करण्याची तयारी
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 30, 2020 | 7:31 PM
Share

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात (Fear Of Lockdown Extension) सुरवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर या लॉकडाऊनचा कालावधी आणखी 19 दिवसांनी वाढवण्यात आला. म्हणजे देशात एकूण 40 दिवसांचा लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा दुसरा कालावधी हा येत्या 3 मे रोजी पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई एमएमआरडीए क्षेत्रात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे 3 मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या भीतीने मुंबईत मोलमजुरी (Fear Of Lockdown Extension) करणाऱ्या मजूर आणि कामगारांनी नाईलाजास्तव आपल्या गावाकडची वाट धरली आहे.

मुंबईतील कांजूरमार्ग येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या मजूरांच्या कुटुंबांवर सध्या उपाशी राहण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कामं बंद आहेत. उरलासुरला गाठीला असलेला पैसाही आता संपला. त्यामुळे नाईलाजास्तव या कुटुंबांनी अकोला जिल्ह्याच्या दिशेने आपल्या गावापर्यंतची 600 किलोमीटरची पायपीट सुरु केली. डोक्यावर गाठोडे, कडेवर लहानग्यांना घेऊन त्यांची भर उन्हातली ही पायपीट (Fear Of Lockdown Extension) मन विषणं करणारी आहे.

या कुटुंबातील महिला घरकाम करतात, तर पुरुष हे रोजंदारीवर मजुरी करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या सर्व कामे ठप्प पडली आहेत. शिधावटप पत्रिका नसल्याने त्यांना धान्यही मिळत नाही. जेवणाची पाकिटे कधी मिळतात, तर कधी त्यांनी उपाशीपोटी राहावे लागत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव हे लोक गावी निघाले आहेत.

मात्र, हे लोक गावी पोहोचले तरी तिथेही त्यांच्या खाण्या-पिण्याची, राहण्याची कुठलीही सोय नाही. गावी गेल्यावर 14 दिवस शिवारात शेतात राहावं लागणार आहे. पण तेथे खायला कोण देणार, ही विवंचना आहे, असं दुःख सुनीता संजय खुराडे या महिलेने (Fear Of Lockdown Extension) व्यक्त केलं.

संबंधित बातम्या :

‘मातोश्री’मध्ये जाण्यासाठी आक्रमक, माथेफिरु तरुणाचा गोंधळ, जेसीबीवर दगडफेक

Corona : मुंबईत कोरोना मृत्यूदर जवळपास निम्म्याने घटला

धारावीत अन्नवाटप करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, आशिष शेलारांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...