आता दिवाळीपर्यंत स्वस्तच मिळतील भाज्या, असे असतील नवे भाव

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दरत स्वस्त झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

आता दिवाळीपर्यंत स्वस्तच मिळतील भाज्या, असे असतील नवे भाव
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 3:07 PM

नवी मुंबई : कोरोनाच्या संकटात एकीकडे आर्थिक संकट असताना दुसरीकडे महागाईदेखील वाढली होती. पण आता सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. परतीच्या पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झालं होतं. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दरत स्वस्त झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी सापडलेल्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. (Good news Mumbai APMC Vegetable Market Prices Stable Due to Increased Vegetable)

मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात गेल्या दोन दिवसांपासून आवक कमी असल्याने भाजीपाल्याच्या किंमतीत दरवाढ झाली होती. मात्र, सर्वसामान्य आता सुटकेचा श्वास घेऊ शकतात. घाऊक बाजारात आज 627 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर हे पुन्हा स्थिर झाले आहेत.

पुणे, नाशिक, नगर, कर्नाटक, गुजरात, जळगाव, लातूर या सर्व ठिकाणांहून आज गाड्यांची आवक मोठया प्रमाणावर झाली आहे अशी माहिती भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली आहे.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती. परंतु आज जवळपास 8 महिन्यांनंतर आज एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 627 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. तर आज भाज्यांच्या किंमतीत किती घसरण झाली आहे हे आपण जाणून घेऊया..

काकडी – 20 ते 25 रु किलो मिरची – 35 ते 45 रु किलो शिमला मिरची – 40 ते 60 रु किलो भेंडी – 25 ते 35 रु गवार – 50 ते 60 रु किलो कोबी – 20 ते 30 रु किलो फरसबी – 45 ते 55 रु किलो शेवगा – 50 ते 60 रु किलो रताळे – 25 ते 30 रु किलो कोथिंबीर – 40 ते 60 जुडी मेथी – 15 ते 25 जुडी वाटाणा – 100 ते 140 रु किलो टोमॅटो – 20 ते 30 रु किलो विकला जात आहे.

दरम्यान, सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आता भाज्यांच्या किंमतीत जी घसरण झाली आहे दिवाळीपर्यंत अशीच राहणार असल्याची माहिती भाजीपाला मार्केटच्या संचालक शंकर पिंगळे यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट असलं तरी अशी आर्थिक साथ मिळत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

इतर बातम्या – 

Gold Price: सलग दुसऱ्यांदा 5,500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा दिवाळीपर्यंत काय असेल भाव

पुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

(Good news Mumbai APMC Vegetable Market Prices Stable Due to Increased Vegetable)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.