दिल्लीत हॉटेलमध्ये मृत्यूचे तांडव, भयंकर घटना, तब्बल 21 जणांचा मृत्यू तर..
दिल्लीमध्ये धक्कादायक घटना घडली. थेट एका हॉटेलला आग लागली. ज्याने एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, परिस्थिती इतकी गंभीर होती की, अनेक लोकांनी कोणताही विचार न करता थेट बालनीतून खाली उड्या मारल्या. काही जण गंभीर जखमी झाले.

एक मोठ्या आगीची घटना घडली. दिल्लीतील उच्चभ्रू मालवीय नगरमध्ये एका मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटला आग लागली. ही आग अचानक लागली आणि मोठा भडका उडाला. काही मिनिटातच इमारतीमधून धुराचे लोट निघाली. लोकांनी जीव वाचवण्याकरिता खिडक्या आणि बालकीकडे धाव घेतली. मात्र, काही सेकंदातच आग पसरली. आग इतकी जास्त भयंकर होती की, काही वेळातच भडका उडाला. या आगीच्या घटनेत तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला. अनेकांवर उपचार सुरू आहेत. मृतांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ होऊ शकते. प्रत्यक्षदर्शींच्या मते, परिस्थिती इतकी गंभीर होती की, अनेक लोकांनी कोणताही विचार न करता थेट बालनीतून खाली उड्या मारल्या. काही जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही काही लोक आतमध्येच अडकल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी बचावकार्य राबवले जातंय.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, परिस्थिती इतकी गंभीर होती की, अनेक लोकांनी थेट खाली उड्या मारल्या. या घटनेमुळे राजधानीतील इमारतींमधील अग्निसुरक्षा उपाययोजनांविषयी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अग इतक्या जास्त वेगाने पसरली की, लोकांना काही कळण्याच्या आतच आग भडकली. आतापर्यंत या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. गेल्या काही तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. दिल्ली अग्निशमन दलाला आगीच्या घटनेबद्दल 9.10 ला फोन आला. त्यानंतर अनेक अग्निशमन गाड्या, पाण्याच्या टाक्या घटनास्थळी पोहोचल्या. मालवीय नगरमधील लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये आग लागली. ती आग वेगाने एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर पोहोचली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तळघरासह अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना वाचवले. लोकांना सुरक्षित बाहेर काढले. अजूनही बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 21 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. काही जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच लोकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी धाव घेतली. लोकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत आगीच्या घटना घडत असून या घटनांमध्ये मोठी वाढ झाली.
